Monday, October 25, 2010

सुजाण पालकत्व

मातृदेवो भव । पितृदेवो भव ।
भारतीय संस्कृतीचा ठेवा, हे आता फक्त लिहून वाचण्यापर्यंत शिल्लक राहिलेले आहे. पण आजचा विद्यार्थी खरेच असा का बनत चालला आहे? याचा खोलवर विचार केल्यास भूतकालीन आयुष्याची चित्रे उलगडून स्मरणात येते की, पूर्वी एकत्र कुटुंबामुळे आईचे नाते, बाबांचे नाते सहवासातून, स्पर्शातून, संवादातून गहिरे असायचे. मुलांना आई-वडिलांची  ओढ असायची. आई कितीही कामात असली तरी ‘घार उडते आकाशी मन असे पिल्लाशी’ म्हणीप्रमाणे आई मुलांची नजरानजरही गोड वाटायची.
आजची स्थिती आई, बाबा, दोन मुले असे विभक्त कुटुंब त्यात आई-बाबा दोघेही नोकरीच्या निमित्ताने बाहेर. पाल्यासाठी वेळ देऊ शकतो का? पाल्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेम निर्माण असण्यासाठी आपण कोठे कमी पडता? पैशाने सर्व सुखे मिळत नाहीत. काही वेळा शब्दांचा दिलासा, कौतुकाची थाप व मुलांच्या कुतुहल बुद्धीचे, शंकांचे निरसन या गोष्टींचेही पालकांनी पाल्याचे स्वागत करावे. कधी रागावणे, कधी धाक दाखवणे, कधी त्याचा मित्र बनून खेळणे, कधी त्याचा नवीन विषयाचा अभ्यास घेणे, निदान शाळेतलाच अभ्यास पुन्हा घेऊन पक्का करणे, हे महत्त्वाचे आहे.
आजच्या शिक्षणात आणखी वाढते विषय भरीस पडले आहेत. जसे मूल्य शिक्षण, सामान्य ज्ञान, पर्यावरण, संगणक, व्यक्तिमत्त्व विकास शिक्षणाचा दर्जा उंचावत चाललेला आहे. उच्च स्तरावर शिक्षणाची पातळी वाढत चालली आहे. उंचावलेला हा वटवृक्ष फांद्यांचा एकमेव आधार आहे. शाळेत विद्यार्थी 5 ते 6 तास असतो. वर्गातील 70 ते 75 मुलांना काही-काही मिनिटांत तो विषय अभ्यासक्रमाप्रमाणे संपवायचा असे बंधन असते. मनात असूनही शिक्षकांना विषयांचे सविस्तर शिक्षण विद्यार्थ्यांना देणे वेळेअभावी शक्य नसते. अशावेळी 24 तासांतील 5 ते 6 तास शाळा, 8 तास झोप व उरलेल्या तासांत पालक काहीतरी वेळ पाल्यासाठी नियोजनपूर्वक मनात असेल तर काढू शकतात. सुट्‌ट्यांतही ते पाल्याला काही शिकवू शकतात. निदान नवीन विषयांची जाण पाल्याला अधिक माहितीपूर्वक देऊ शकतात. जरी शाळेत, शिकवणीत विद्यार्थी शिकत असला तरी घरच्या शिक्षणातही सहभाग असणे आजच्या स्पर्धात्मक युगात जरुरीचे आहे. विद्यार्थ्यांना टीव्हीवरील शैक्षणिक कार्यक्र्रम दाखवायला हवेच, पण सर्वच कार्यक्रम आवश्यक नाहीत. शैक्षणिक कार्यक्रम दाखविल्यास त्याचा फायदा होईल व इतर कार्यक्रमांचे दुष्परिणामही कमी होतील व वेळही सार्थकी लागेल.
पालकांनी आपल्या पाल्यासाठी शाळेत 15-15 दिवसांनी शिक्षकांना भेटायला हवे. पाल्याचे मित्र कोण? वर्गात त्याचे लक्ष कितपत असते? गृहपाठ वेळेवर करतो का? त्याचे वागणे, बोलणे, राहणे, आहार या सर्व बारीक गोष्टींतूनही पालकांनी जागृत असावे. घरच्या वातावरणातील संवाद एकमेकांसाठी सहकार्याची भावना, घरातील प्रत्येक माणूस कुटुंब, समाज, मग देश हे सारे माणुसकीचे माणूस म्हणून जगण्यासाठी, पुढची पायरी भविष्यकाळात उज्ज्वल दिशा होण्यासाठी आजची पिढी आजच्या भक्कम पायाचा खंबीर आधार, मजबूत मूल्यांच्या संस्काराचे शिक्षण हृदयात जतन करायला पाहिजे, तरच शिक्षणाचे उद्दिष्ट सफलपूर्ण होईल.
स्पर्धायुगातील टक्केवारीत सूडाची भावना व्यक्त होऊ न देता प्रत्येकाला स्पर्धा ही जीवनासाठी हितकारक आहे, अशी मनाची धारणा ठेवल्यास, समाधानाची शिदोरी पाल्यास दिल्यास पालकत्व चिरंतन मूल्यांचे वाटेल, यात शंका नाही. सरळ-सरळ जीवनाला सामारे जाण्याची ताकद निर्माण करण्याचे काम पालकांचे आहे.
तत्त्वज्ञानाच्या उच्च भाषेपेक्षा प्रेमाची भाषा, आपुलकीची भावना जास्त जवळची वाटेल. आजचे शिक्षण विद्याथ्यांचे कुवतीबाहेरचे आहे. तरीही त्यांची कुवत व्यवस्थित असण्यासाठी पालकांनी मेहनत घेणे जास्त गरजेचे आहे. चंदनासारखे झिजल्यावर सुगंध दरवळतोच, पण आधी झिजण्याची क्रिया व्हावी लागते.
मुले ही तर निरागस, निष्पाप असतात. त्यांना वेळीच घडवणे, आकार देणे हे पालकांच्या हातात असतो. जसे पेरावे तसे उगवते या उक्तीप्रमाणे व्यवस्थित खतपाणी घातल्यास पाल्यांची उज्ज्वल पहाट नक्कीच उजाडेल.
"मुले ही फुले" असे नेहमी नेहरूजी म्हणत. सुंदर फुले, गोड फळे मिळण्यासाठी आधी कष्ट करावे लागतात. मगच त्यांचा आस्वाद सुखकारक वाटतो. संस्कारांच्या खतपाण्याची जबाबदारी पालकांची असते.
आजचा विद्यार्थी पालक व शिक्षकांचा आदर तेव्हाच करील जेव्हा दोघांचेही त्याला मार्गदर्शन लाभेल. कितीतरी वेळा मुलांना यश मिळाल्यावर ते नेहमीच मुलाखतीत आपल्या आई-वडिलांचे व गुरुंचे श्रेय, आशीर्वाद म्हणूनच मी आज काही करू शकलो असे सांगतात. त्याचे कारण मुलांच्या अनुभवांतून त्यांचे उद्‌गार आनंदाने बाहेर पडतात. आई-वडिलांनाही मग मुलांबद्दल अभिमान वाटतो.
म्हणूनच सुजाण, सुशिक्षित, आदर्श पालकत्व होण्यासाठी पाल्याचे जीवन सार्थकी लावणे, त्यांच्या शिक्षणात हातभार लावणे पालकांची जबाबदारी व कर्तव्य आहे.

-    सौ. श्वेता सं. संखे

Tuesday, October 19, 2010

शाब्बास ! आगे बढो !

आमच्या दोन माजी विद्यार्थिनी आणि इयत्ता 9 वी मध्ये शिकत असलेला एक आजी विद्यार्थी ह्यांच्या सुयशाने आम्ही हरखून गेलो आहोत.

तीन शिलेदार 

कु. आकांक्षा राणे - (शालान्त परीक्षा 2005)

आकांक्षा मुंबई विद्यापीठाचा बीएससी 2010 परीक्षेत गणितात 91% गुण मिळवून सर्वप्रथम आली आहे. आता गणितातच संशोधन करून डॉक्टरेट मिळवण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे.कु. आकांक्षा राणे

 

एसएससीपासूनच कोणत्याही कोचिंग क्लासला न जाणारी आकांक्षा, सुप्रसिद्ध गणितज्ज्ञ आणि "इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' चे भूतपूर्व संचालक डॉ. व्ही. व्ही. राणे ह्यांची कन्या आहे.

कु. मृदुला कुलकर्णी - (शालान्त परीक्षा 2003) मृदुलाने "वेदान्त शास्त्रा'मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एम.ए. 2010 परीक्षेत सुवर्णपदक मिळवलेले आहे. कु. मृदुला कुलकर्णी

मृदुलाचा शास्त्रीय संगीताचाही अभ्यास असून संस्कृत श्लोक गाण्याची तिला आवड आहे. इतकेच नाही तर लावण्या आणि फिल्मी गाण्यांचे संस्कृतमध्ये रूपांतर करून गाण्याचा तिचा अनोखा छंद आहे.

कु. ओंकार मसूरकर, 9वी ब (इंग्रजी माध्यम)

ओंकारने राष्ट्रीय स्तरावरील 2010 ची एनटीस शिष्यवृत्ती पटकु. ओंकार मसूरकरकावली आहे. त्याच्या ह्या यशाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत :

टप्पा 1 - एसटीएस (राज्यस्तरीय). राज्यातून निवडलेल्या 500 विद्यार्थ्यांपैकी एक. गुण 164/200 थिअरी

टप्पा 2 - एनटीएस (राष्ट्रीय स्तर). अखिल भारतातून निवडलेल्या 4000 विद्यार्थ्यांपैकी एक. गुण 165/200 थिअरी

टप्पा 3 - एनटीएस (राष्ट्रीय स्तर). अखिल भारतातून निवडलेल्या 1000 विद्यार्थ्यांपैकी एक. गुण 19/25 मुलाखत.

भारतात 25 वा क्रमांक

नमस्कार...आचार्य... विरुद्ध गुड मॉर्निंग टीचर...


काही दिवसांपूर्वी शाळेतील आजी विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गात जाऊन भेटण्याचा योग आला ...तेव्हा वर्गात प्रवेश करताच सर्व विद्यार्थी वन... टु... गुड मॉर्निंग टीssssचर. असा घोष करीत कसेतरी उभे राहिले. हे दृश्य अतिशय विचित्र वाटलं ... मराठी माध्यमाच्या वर्गात शिक्षकांचे स्वागत इंग्रजीमधून व्हावे हा विरोधाभास वाटला...मृदुला कुलकर्णी
भाषेचा मुद्दा सोडला तरी आपली संस्कृती लक्षात घेता शिक्षकांनी वर्गात येताच विद्यार्थ्यांनी केवळ उठून उभे राहून हात जोडून नमस्कार करणे बरे दिसते. त्या साठी उगाच काही वेळ घालवून बालिश पणाने वन ... टु... असे म्हणत स्वागत करणे काही बरे वाटत नाही. एवढेही जमत नसल्यास केवळ उठून उभे राहणे पुरेसे आहे...
नमस्कार करण्यामागचा किंवा उठून उभे राहण्या मागचा उद्देश शिक्षकांना सन्मान देणे एवढाच असतो... त्याकरता विद्यार्थ्यांनी केवळ उठून नमस्कार करणे एवढी क्रिया पुरे आहे असे मला वाटते ...
आपली शाळा संस्कृतीचे जतन करणारी एक अग्रगण्य संस्था आहे ...  तेव्हा कृपया वरील मुद्द्याचा विचार केला जावा अशी विनंती ...
धन्यवाद ...
मृदुला कुलकर्णी ...

Monday, September 13, 2010

Scholarship Exam Results 2009-10

 

English Primary Section

Sr

No.

Name of the student

Marks

obtained

Out of 300

Rank

Out of

1977

1

Mst. Yash Sandeep Sawant

286

6th

2

Mst. Viraj Sunil Tawade

270

14th

3

Mst. Tanmay Vishwanath Nagwekar

268

15th

4

Mst. Atharva Bhalchandra Wadekar

264

17th

5

Ms. Swara Manoj Pathare

262

18th

6

Ms. Anushka Rajan Chachad

258

20th

7

Ms. Srushti Surendranath Haleangadi

256

21st

8

Mst. Yash Suhas Kudalkar

256

21st

9

Ms. Supriya Krushnakumar Samant

256

21st

10

Ms. Swarangi Sharad Choche

254

22nd

11

Ms. Saniya Paresh Kirkire

252

23rd

12

Mst. Rahul Nandkumar Mirashi

252

23rd

13

Ms. Aditee Satish Bawdhankar

250

24th

14

Ms. Chinmayee Shrikant Khare

248

25th

15

Ms. Shriya Hemant Wade

246

26th

16

Ms. Supra Pradeep Kudu

240

29th

17

Ms. Pooja Shailesh Deshpande

240

29th

18

Ms. Rasika Sameer Kalgutkar

238

30th

19

Ms. Navita Dilip Ukarde

236

31st

20

Ms. Ruchita Sanjay Nachne

236

31st

Marathi Primary Section

Sr.

No

Name of the student

Marks

Obtained

Out of

300

Rank

Out of

1977

1

Mst. Jayraj Vinayak Saraf

278

10th

2

Mst. Ninad Satish Thatte

264

17th

3

Ms. Swarangi Santosh Saraf

262

18th

4

Mst. Kaustubh Ramchandra Jadhav

258

20th

5

Ms. Jai Anant Jadhav

246

26th

6

Mst. Sudarshan Pandurang Sangle

244

27th

7

Mst. Sahil Praful Gosavi

244

27th

8

Ms. Samruddhi Yashwant Lavekar

244

27th

9

Mst. Siddhant satish Kudav

240

29th

10

Ms. Mrunamayee Ganesh Apte

238

30th

11

Ms. Advaita Deepak Sawant

236

31st

English Secondary Section

Sr.

no.

Name of the student

Total Marks

Obtained

out of 300

Rank

out of

1617

1

Mst. Soham Sachetan Gurjar

247

11

2

Mst. Rushikesh Prasad Joshi

238

34

3

Mst. Saurav Vishwas Surve

232

70

4

Mst. Pranav Umesh Karmarkar

229

86

5

Ms. Disha Anand Palkar

224

121

6

Mst. Sagar Paresh Shah

220

159

7

Mst. Akshay Yogesh Dalvi

215

218

8

Mst. Varun Rajesh Rege

206

346

9

Mst. Devashish Prasad Joshi

204

395

10

Mst. Ujjwal Raghunath Raut

199

494

11

Mst. Kunal Deepak Mestry

195

614

12

Mst. Vedant Ujjwal Vartak

192

702

13

Ms. Hemali Sandeep Sawant

188

848

14

Ms. Yashashree Laxman Samant

184

1045

15

Ms. Krupa Rajendra Gawde

183

1072

16

Mst. Omkar Sameer Samant

178

1311

17

Mst. Chirag Suresh Kothari

176

1487

Wednesday, September 8, 2010

Sunday, September 5, 2010

Examining Independence Day

Courtesy : http://sukumar-honkote.blogspot.com/

On our 64th independence day, we need to examine what this day means to us. I was told by a person yesterday that they never failed to go to school on this day as they were treated with chocolates and snacks. My memory goes back to the parades and the speeches extolling the past and invoking the future. Everyone has childhood remembrances associated with 15th august but none who understands even an iota of its significance in 1947.

   What does this day mean to us? A holiday to laze and relax, to go out with friends or family? A flame of patriotism does get evoked but to what consequence? It's a day to remind us to play Lata Mangeshkar's vande mataram and A.R. Rehman's Maa tujhe salaam. We wear Indian flag pin-ups, wave flags, add photos proclaiming independence to our profiles on facebook. What are we trying to achieve through this in your face proclamation? Dry day and the national holidays have become synonymous. Long speeches extolling the freedom struggle adorn the day but do we understand exploitation faced then when we talk of independence? Do the leaders who claim a great tomorrow realize the tomorrow that is not coming due to their actions? Can the omnipresent disdain shown by the people towards present conditions be channelled into a wave of social upliftment?

   Nehru enunciated 'the achievement we celebrate today is but a step, an opening of opportunity, to greater triumphs animaged achievements that await us.' The opportunity is ever present, triumphs are ever waiting. Instead of broadcasting our patriotism a small act of helping the nation and its citizens would go a long way in building a better India. In the wake of the present J and K crisis and the CWG scandal much responsibility of improvement is on our shoulders. Are we in need of a second independence to rout out the evil that plagues the nation? Are we really patriotic in our actions towards the nation and its people?

   Although cynicism beckons me to voice all this but I too question what I have done to strengthen the nation. I reiterate Nehru's question. 'Are we brave and wise enough to grasp the opportunity and accept the challenge of the future?'

Friday, August 20, 2010

Felicitation Ceremony Honouring Meritorious Students


Felicitation ceremony for meritorious students of SSC- March 2010 was held on 27th June, 2010 at 5.30 p.m. in the hall of new building. Ninety seven students were felicitated for their excellent performance and achievements in SSC Board Examination March-2010.

The function was graced by Hon. Mr. Yashwant M Devasthali, Director, Finance, L & T Ltd. The students, who secured 85% and above were honored with cash prizes and certificates. The sincere efforts of the students and the parents was recognized and felicitated by Vidya Prasarak Mandal.

The felicitation programme was commenced with prayer and welcome song, followed by welcome speech and introduction of chief guest by Mr. Vasuki Haranhalli, an active member of VPM’S governing council. The function was anchored by our teachers Mrs. Usha Shimoga and Mr. Sudhir Desai in English and Marathi respectively.

The chief guest congratulated the students for their excellent performance. He also congratulated the teachers and the parents not only for the achievements but for moulding the students the right way. “India will go on developing and the whole world will look at India. You will be able to fulfill your dreams in your own country. No need to go to America. Be innovative because you have that quality and capability.” advised, Mr.Y.M Devsthali. He asked the students to live the life with simplicity and humanity. He acknowledged the students ability and gifted them the motto to climb the ladder of success-“Never say NO to the work assigned to you, say I will do it.”

Mr. Gangurdey and Mr. Nare, the parents of first rank holders of both the sections expressed their gratitude towards school on behalf of all the parents. Hence, Mr. J S Salunkhe acknowledged the selfless efforts of the teachers on this day and asked the students to recognize and reciprocate even in future.

“To imagine a school without teachers is as impossible as to live without being born. Teachers are the real idols in the temple of knowledge.” Said, Ms.Gauri Nare, the first rankholder of English Medium. Mrs. Varsha Padvale and Mrs.Nilima Khadatkar congratulated their twinkling stars and future ambassadors on behalf of all the teachers. They motivated them for their future Endeavour’s. The programme was concluded with vote of thanks by Head Master Mr. D K Wagh.


Wednesday, July 28, 2010

बालोद्यान - एक आनंदयात्रा

- डॉ. सौ. वसुंधरा नाटेकर

डॉ. सौ. वसुंधरा नाटेकर
अरुणकमल प्राचीवर फुलले ...
पूर्वदिशेला (प्राची) सूर्य (अरुणकमल) उगवला  आणि त्याने साऱ्या सृष्टीत नवचैतन्य, आनंद फुलवला, हे तर अगदी नित्याचेच आहे.  आणि मग आपल्या दैनंदिन यात्रेला आनंदाने सुरुवात होते.  शिक्षणक्षेत्रातही अशीच एक आनंदयात्रा सुरू होते,  बालोद्यान - बालवाडीच्या रूपाने !
'बालोद्यान' - बाळगोपाळांनीं खेळण्याची, हसण्या-बागडण्याची बाग.  त्यांच्या शालेय आयुष्याची इवलीशी आनंदयात्रा सुरू होते ती याच बालोद्यानात.  त्यामुळे या उद्यानाचे अंतर्बाह्य स्वरूप कसे असेल किंवा असावे,  यचे कल्पनाचित्र आपल्या दृष्टीसमोर नक्कीच उभे राहिले असेल.
बालवाडीची संकल्पना मॅडम मॉंटेसरी यांनी मांडली ती अशी- 

'Education is not what teacher gives, it is aquired not by listening to words but by experience from the 'Enviornment '.  It is a method not of 'teaching' a child, but of 'living' by a child.'

    थोडक्यात, शिक्षक काय शिकवतात किंवा मुले शब्दरूपात काय ऐकतात, ते शिक्षण नव्हे, तर आजुबाजूच्या वातावरणातून जो अनुभव मुले घेतात तेच शिक्षण होय .  शिक्षण म्हणजे मुलांना शिकवण्याची पध्दत नसून मुलांकडून शिकण्याची, जाणून घेण्याची प्रक्रिया आहे;  आणि हे सर्वRole Play अगदी नैसर्गिक, हसत-खेळत अत्यंत मोकळ्या - ढाकळ्या , तणावमुक्त वातावरणात होणे हेही तितकेच महत्वाचे आणि अत्यावश्यक आहे; यात दुमत नसावे.

    आपले बाळ घराचा उंबरठा ओलांडून प्रथमच बालोद्यानची पायरी चढते तेव्हा त्याचे स्वागत तेथे कसे होईल? तो रडेल कां? तिथे तो काय करील ? काय शिकेल ? अभ्यास नीट करील नां? यासारख्या असंख्य प्रश्नांनी पालक अस्वस्थ होतात. सध्याच्या स्पर्धात्मक युगात आपले मूल कसे तरून जाईल ? याविषयी साशंक असतात. रोज वर्तमानपत्रातील शिक्षणक्षेत्रातील गोंधळाच्या बातम्यांनी त्यात आणखी भर पडत असते. पालकांच्या जिवाची ही घालमेल काही अंशी कमी व्हावी या उद्देशाने आपल्या बालोद्यानच्या नवीन स्वरूपाविषयी महत्वाची आणि आवश्यक माहिती सविस्तरपणे देत आहे.  बालवाडीचे शास्त्रशुध्द स्वरूप कसे असावे, त्याची उद्दिष्टे कोणती, ती उद्दिष्टे साध्य करण्याकरिता बालवाडीमध्ये लहानग्याना कशा प्रकारे हाताळावे, शिकवावे याविषयीचे माझे हे विवेचन केवळ माझे वैयक्तिक मत नसून मॅडम मॉंटेसरी या पाश्चात्य शिक्षणतज्ञ, तसेच आपल्याकडील श्रीमती ताराबाई मोडक, श्रीमती अनुताई वाघ,  श्रीमती शांताबाई आठवले यासारख्या बालशिक्षणासंबंधी बरेच संशोधन केलेया व्यक्तीचे आहे.

    सर्वप्रथम आपण लहान मुलांच्या शारिरिक, मानसिक भावनिक वाढीसंबंधी शास्त्रीय माहिती पाहू या.  आपल्या संपूर्ण आयुष्याच्या कालखंडाचा विचार केला तर अडीच ते सहा वर्षाचा काळ अत्यंत संवेदनाक्षम आणि संस्कारक्षम असतो.  मुलाच्या अंतरंग विकासाची गती ह्या काळात जेवढी असते तेवढी पुढे सत्तर वर्षापर्यंतही नसते.  तेव्हा हा काळ मुलाच्या व्यक्तिगत सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे ,हे ध्यानात येईल.  मुलाच्या मेंदूची जवळजवळ तीन चतुर्थांश वाढ याच काळात पूर्ण होते.  म्हणून बौध्दिक आणि मानसिक विकासाच्या दृष्टीने हे वय महत्त्वाचे आहे.  या काळात संवेदना ग्रहण करण्याची त्याची शक्ती अधिक तीव्र असते;  आणि शारीरिक जागृत असते.  'हे काय  ? ते काय ? कां ? कसे ?' या जिज्ञासू प्रश्नांचा भडिमार करतात आणि आपण त्याना उत्तरे देताना अगदी मेटाकुटीस येतो याचा अनुभव आपण घेतोच.

    मुलांची ही ओसंडून जाणारी ऊर्जा , प्रचंड जिज्ञासूवृत्ती, संवेदनाशीलता याना जर योग्य प्रकारे वाट दिली, वळण दिले तर त्यांची शारीरिक -मानसिक वाढ अगदी उत्तम होऊ शकेल. आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आपण सर्वजण म्हणजे मुलांचे पालक, शिक्षक-शिक्षिका -सर्वजण मिळून भक्कम करू.  एक गोष्ट आपण सर्वांनी ध्यानात ठेवली पाहिजे की या वयाची मुले टीपकागदासारखी असतात. त्यांच्यासमोर ठेवलेले सर्व बरे-वाईट ती सर्व चटकन आत्मसात करतात,  त्याचे अनुकरण करतात.  तेव्हा त्यांच्यासमोर कोणते संस्कार-आदर्श ठेवायचे.  याचे आत्मभान आपणा सर्वांनाच हवे.

    पहिली अडीच वर्षे मूल परावलंबी, आत्मकेंद्री असते.  सर्वप्रथम आई, मग बाबा, इतर माणसे यांच्या सहवासात वाढत असते.  हळूहळू  मोठे होताना त्याच्या विकासाला चार भिंतींचे घर अपुरे पडू लागते.  त्याला समवयस्क मित्र-मैत्रिणींची गरज वाटू लागते.  हळूहळू ते समाजात मिसळण्यासाठी तयार होत असते.  याचवेळी त्याला समाजात स्थान मिळवून देणारी ही संस्था आहे.  बालवाडी हा घर आणि समाज याना सांधणारा महत्त्वाचा दुवा आहे.  त्यामुळे  बालवाडीचे स्वरूप काहीसे घरासारखे व काहीसे शाळेसारखे असते.  घरासारखे म्हणजे प्रेमळ, घरगुती गोष्टी बोलणारे, आईसारखी कोणीतरी काळजी घेणारी माणसे असणारे; आणि शाळेसारखे म्हणजे स्वत:बरोबरच इतर मुलांचा विचार करणारे, नाना तर्हेचे खेळ , साधने-साहित्य यांचा भरपूर उपयोग करून देणारे, समूह शिक्षणातून सांघिक वृत्ती जोपासणारे, शिस्त शिकवणारे; स्वच्छतेच्या, वागणुकीच्या चांगल्या संवयी लावणारे, असे बालवाडीचे स्वरूप आहे.

    थोडक्यात, बालवाडी म्हणजे प्राथमिक शाळेचा पूर्वअभ्यासक्रम नसून प्राथमिक शाळेतील अभ्यास आत्मसात करण्याची मुलांची मानसिक बैठक तयार करणारी संस्था आहे.  प्राथमिक शाळेत पुढे करायच्या अनेक गोष्टींची सुरुवात बालवाडीत होते.  उदाहरणार्थ, मुलाला संयम शिकावा लागतो,  हालचालींवर ताबा मिळवावा लागतो, मनाची एकाग्रता वाढवावी लागते.  या सर्व गोष्टी मुलाच्या नकळत सहजपणे बालवाडीत साधल्या जातात.  त्यामुळे पुढे शाळेत सलग चार-पाच तास बसणे, लेखन-वाचन करणे, हे सुसह्य होते. मूल अभ्यास करायला कंटाळत नाही, गोंधळत नाही.

    तात्पर्य, बालोद्यानचा अभ्यासक्रम म्हणजे फक्त 1 ते 10 अंक, क, ख,ग, घ; A, B, C, D, 1-10 अंक हे स्वरूप नसून त्याच्या आरोग्याचा विकास म्हणजे स्वच्छता, आहार, व्यायाम, विश्रांती; त्याची मानसिक गरज म्हणजे प्रेम, संरक्षण, विश्वास, मनोरंजन; त्याचा भावनिक विकास म्हणजे आनंद, सहसंवेदना, शांती- समाधान, प्रेमभावना, आदर; हे सर्व बालोद्यानच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत आहे.

    एकूण बालोद्यानचे स्वरूप, कार्य, उद्दिष्ट यांचा सविस्तर ऊहापोह केल्यानंतर पुढचा प्रश्र्न-'आपल्या म्हणजे विद्या प्रसारक मंडळाच्या बालोद्यानमध्ये हे सर्व होते कां?'  या प्रश्र्नाचे उत्तर "हो' असे आहे.  आता चर्चा  केलेल्या 
बऱ्याच गोष्टींचा विचार करूनच आपल्या बालोद्यानची आखणी केलेली आहे. मुलांना साधनांद्वारे, खेळण्यांच्या माध्यमातून सर्व प्रकारचे आवश्यक ते शिक्षण आपण देतोच, पण आतापर्यंत शाळेची जागा मर्यादित होती, आणि बालोद्यानसाठी मिळणारा वेळही थोडा कमी होता.  त्यामुळे अनेक गोष्टी करायच्या मनात असूनही करता येत नव्हता.  परंतु  आता आपण आपल्या शाळेच्या नवीन, भव्य, प्रशस्त, हवेशीर वास्तूत प्रवेश केला आहे.  या नवीन इमारतीत बालोद्यानसाठी उपलब्ध जागा खूपच मोठी आणि ऐसपैस आहे.  मोठेमोठे वर्ग, कार्यशाळा, मैदानव्या इमारतीमधील सभागृहात नी खेळ, बैठे खेळ या सर्वांसाठी भरपूर मोकळी जागा, जेणेकरून आपली मुले स्वैरपणे बागडत, हसतखेळत त्यांच्या नकळ्त शिकू लागतील.
बालवाडीची जास्तीत जास्त उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या नवीन वास्तूत नूतन बालोद्यानची रचना अशी आहे-
-30' X 20' = 500 चौ.फूट आकाराचे 3 वर्ग (खोल्या)
-मैदानी खेळ व बैठे खेळ खेळण्यासाठी अतिशय सुरक्षित व खूप प्रशस्त जागा.
-सी-सॉ, घसरगुंडी, झोपाळे, होड्या यांची मोकळ्या जागेत मांडणी
-मुलामुलींसाठी त्यांच्या उंचीस योग्य अशी, स्वतंत्र , स्वच्छतागृहे.
-मुलांचे बूट वर्गातच ठेवण्यासाठी शूरॅक्स तसेच त्यांचे खाऊचे डबे,वॉटरबॅग, बॅग ठेवण्यासाठी रॅक्स -यांची रचना व उंची अशी की प्रत्येक मूल आपले सामान स्वत: घेऊन वापरू शकेल व स्वावलंबनाचा पाठ त्याला त्यामधूनच मिळेल.
-मुलांना वर्गात बसण्यासाठी आकर्षक रंगाची कारपेटस्‌ व त्यावर सुंदर सतरंज्या.  त्याच्यासमोर रंगीबेरंगी छोटी,लांब लाकडी बाकडी त्यांचा उपयोग मुलानी खाऊ खाणे, चित्रकला, हस्तकला, खेळ्-मांडणी यासाठी होईल.

* मुलांना  बसवण्यासाठी मोठी बेंचेस नाहीत.

कारण -     1) या वयातील मुलांनी एकाच जागी बसून राहाणे अपेक्षित नाही.  त्यांच्या शरीराची सतत हालचाल हवी, जी त्यांच्या स्नायूंच्या वाढीला पोषक आहे. एकाच जागी बसणारे मूल आळशी, मलूल दुबळे होते.  त्याच्यातील नैसर्गिक उर्जेला वाव देण्यासाठी त्याने सतत खेळते राहावे.

    2) त्याची सोशल डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टीनेही ते एकाच जागी बसणे योग्य नाही.  त्यामुळे ठराविक मुलांशीच त्याचा संवाद होईल.  शेजार, सहकार्य, दुसऱ्याला समजून घेणे या गोष्टींसाठी मुलांनी छोट्या छोट्या ग्रूपमध्ये राहाणे अपेक्षित आहे.

    3) जमिनीवर बसल्याने मुलांच्या शिक्षिका देखील त्यांच्याजवळ तशाच बसून गप्पा-गोष्टी करतील.  त्यांचा सहवास मुलांना सुरक्षितता आणि आईची मायाही देतो, त्यामुळे मुलांची बाईंशी भावनिक जवळीक निर्माण होऊन ती तणावमुक्त वातावरणात हसत-खेळत शिकतील.

    4) शारिरिक वाढीच्या दृष्टीनेही बेंचवर बसल्याने मुलांच्या हालचालीवर बंधन येते.  विशिष्ट कोनातच गुडघे-पाय-राहिल्याने त्यांचे स्नायू, स्नायूबंधने, सांधे यांची वाढ योग्य प्रमाणात न होता ते जखडल्यासारखे होतात.  मांडी घालून बसण्याची नैसर्गिक क्रिया सुध्दा शिकवावी लागते.  आज आपल्या संस्कारातील सूर्यनमस्कार, योगक्रिया यांचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे, उद्या मांडी घालून बसण्याचे फायदे आपल्याला त्यांच्याकडून ऐकावे न लागोत !

* मुलाना पेन-पेन्सिल-वही लिखाणासाठी नाही:


या वयातील मुलांनी बाराखडी, अंकलेखन  इ. करणे अपेक्षित तर नाहीच किंबहुना शास्त्रीय दृष्टया ते पूर्ण चुकीचे आहे.  कारण या वयात त्यांच्या हाताची बोटे व मनगटे यांचे स्नायू  व सांधे यांची वाढ झालेली नसते.  अशावेळी लिखाणासारखे काम करताना त्यावर पडणारा अनावश्यक  व अति दाब त्यांच्या नैसार्गिक वाढीला अडथळा करतो.  शिवाय डोळे हे ज्ञानेंद्रिय व हात, बोटे हे कर्मेन्द्रिये यांच्या कामाचा मेळ (co-ordination)  ही व्यवस्थित होत नसतो. परिणामी लेखन-हस्ताक्षर बिघडते; सदोष होते.

    तात्पर्य, या वयातील मुलांना लिखाणाची जबरदस्ती करू नये; इतर शाळांमध्ये बरेच लेखन मुलांना शिकवले जाते म्हणून लिखाणाचा अट्टाहास करू नये.  त्यामुळे आमच्या शिक्षण देण्याच्या मूळ संकल्पनेलाच तडा जाईल.  आपल्या बालोद्यानमध्ये मुलांना भाषाकौशल्य, गणित, इंद्रिय-विज्ञान, संगीत, नृत्य इ.विषय आपण त्यांच्या नियोजित अभ्यासक्रमाप्रमाणे शिकवणारच आहोत, पण ते सर्व साधनांद्वारे, खेळाद्वारे. म्हणजे मनोरंजनातून त्यांचे शिक्षण होईल, जेणेकरून त्या त्या विषयातील मूळ संकल्पना (Basic concepts)  सुरूवातीपासूनच पक्के होतील. तेव्हा दोन वर्ष तरी मुलांच्या अभ्यासाविषयी, गृहपाठाविषयी निश्चिंत राहा आणि हा वाचलेला वेळ आपल्या मुलाबरोबर खेळण्यात, गप्पा मारण्याबालोद्यानातील रंगपंचमी त सत्कारणी लावा.  विश्वास ठेवा, असे केल्याने तुमचे मूल अभ्यासात मागे न राहाता पुढील प्राथमिक अभ्यासाची त्याची पूर्वतयारी इतकी सुंदर होईल की उत्तरोत्तर त्याच्या प्रगतीचा आलेख उंचावलेलाच दिसेल.  आपल्या विद्यामंदिर शाळेचे दरवर्षीचे दहावीचे  निकाल आणि अभ्यासेतर क्षेत्र जसे क्रीडा, गायन-नृत्य, विज्ञान इ.मधील मुलांचे नैपुण्य पाहिले तर आपली खात्री पटेल की, ही संस्था, शाळेचे  शिक्षक मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.  मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांची जडणघडण अशी केली जाते की भविष्यात तो एक सक्षम नागरिक बनेल, आणि त्याची पायाभरणी आपल्या बालोद्यानमध्येच केली जाते. कारण मुलाचे बालपण कसे गेले आहे, त्यावर त्याचे तरुणपणीचे व्यक्तिमत्त्व अवलंबून असते.

    ह्या सविस्तर लेखनाचा समारोप करताना सांगावेसे वाटते की, पालक म्हणून आपण आपल्या मुलांना दोन गोष्टी देऊ शकतो. ताठ उभे राहाण्यासाठी मूळ आणि आकाशात झेप घेण्यासाठी पंख !

Monday, July 19, 2010

कौतुक सोहळा २०१०

शालान्त परीक्षेचा निर्णय लागल्यावर दरवर्षीप्रमाणेच विद्या मंदिरच्या प्रांगणात उत्साहाचे वातावरण होते.

मराठी विभागाचा निर्णय ९१.४९% तर इंग्लिश विभागाचा निर्णय १००% लागला.

 

image image

         image      परुष्णी विलास मांजरेकर ९४%

        image      सूरज उदय पै ९३.३८%

यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा साजरा करताना बेस्ट ऑफ फाइव्हप्रमाणे गुण विचारात घ्यायचे की नाही हे नक्की होत नव्हते. अखेरीस मुलांच्या कौतुकासाठी उशीर तरी किती करायचा ह्या विचाराने पारंपारिक पद्धतीनुसार मिळालेले गुण विचारात घेण्यात आले.

clip_image002clip_image004 

imageimageimage

  ह्या सर्व गुणी विद्यार्थ्यांचं कौतुक २७ जून रोजी विद्या मंदिर शाळेच्या नव्या सभागृहात एका सुंदर सोहळ्यात करण्यात आलं. शाळेचेIMG_6464 (Large) हितचिंतक आणि आश्रयदाते एल अँड टी चे वित्तीय संचालक श्री. यशवंत देवस्थळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी  होते. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध विमा गणिती, 

श्री. ज. स. साळुंखे, उपाध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर, शाळा समितीचे अध्यक्ष श्री. दिलीप म्हांबरे, मुख्याध्यापक श्री. दि. का. वाघ सर आणि सौ. जागृती सावे मॅडम ह्यांच्या  सन्माननीय उपस्थितीत हा IMG_6588 (Large)सोहळा साजरा झाला. मंडळाचे सदस्य, हितचिंतक, पालक आणि विद्यार्थी समारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ह्या प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची तसेच शिक्ष कांची भाषणे झाली.  श्री. सुधीर देसाई सर आणि श्रीमती उषा शिमोगा मॅडम ह्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

दरवर्षीप्रमाणेच मुलांच्या यशाचा आढावा घेणारी एक पुस्तिका वितरित करण्यात आली होती.  IMG_6449 (Large)

शाळेच्या नव्या इमारतीमध्ये हा सोहळा साजरा होत असल्याचा विशेष आनंद सर्वांनाच विशेषत: विद्यार्थ्यांना होता.

Saturday, June 19, 2010

हे स्वप्न की म्हणावे...

निर्विघ्नं कुरु मे देव | सर्व कार्येषु सर्वदा ||

जेव्हा स्वप्न साकार होते तेव्हा मनात येणाऱ्या भावभावना अवर्णनीय असतात. हे खरंच प्रत्यक्षात आलंय का असं वाटत राहतं. विशेषतः एखादा उराशी बाळगलेला ध्यास साध्य झाला की स्वत:ला ओतून  घेतल्यावर येणारं प्रसन्न रितेपणही आनंदासोबत असतं. 

साडेबारा कोटी रु पहिल्या प्रवेशाचा मान होता इंग्रजी प्राथमिक विभागाचापये खर्चाच्या प्रकल्पाला ज्यावेळी मराठी शाळा  चालवणारी किंवा मराठी वळणाची इंग्रजी शाळा चालवणारी माणसं हात घालतात त्यावेळी त्यांना बहुतेकांनी वेडात काढलेलं असतं. ‘शाळा बांधताय की मॉल?’ अशासारखी शंकेखोर वक्तव्यं सहन करीत जेव्हा काही ‘पछाडलेली’ मंडळी स्वतःला या कामात झोकून देतात तेव्हा साकारतं एक नवल.

दहिसरच्या विद्या मंदिर शाळेत 14 जूनला जेव्हा मुलांनी शाळेच्या नव्या वर्गांमध्ये प्रवेश केला तेScaling the heightsव्हा असंच नवल प्रत्यक्षात घडलं. 600 चौ.फुटांचे भव्य वर्ग, 4’x16’ लांबीचे मॅग्नेटिक  ग्रीन बोर्डस्, 1’x3’x16’ आकाराचे प्लॅटफॉर्म्स, ही आहे या शाळेची एक झलक.

प्रत्येक वर्गात, प्रत्येक मजल्यावर भरपूर मोकळी जागा आहे. पश्चिमेकडून आणि नैऋत्येकडून येणारा वारा आहे आणि उत्तरेकडून येणारा मोकळा प्रकाश! साऱ्या बाळगोपाळांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते. नाचत, उड्या मारत वर्गात शिरणाऱ्या मुलांचा आनंदाचे डोही आनंद तरंग निर्व्याज आनंद पाहण्यासारखा होता.

ह्या स्वप्नपूर्तिसाठी जीवापाड कष्ट केलेली शिक्षक मंडळी हरखून गेलेली हो ती.

‘सुखार्थिनः कुतो विद्या  कुतो विद्यार्थिनः सुखम् । असं म्हणण्याचे दिवस आता गेले आहेत. चिंचोळ्या  गल्लीबोळातला प्रत्येक ‘कोचिंग क्लास’ आता ‘एसी’ असावा लागतो. अशा व्याउभारोनि उंच बाहू... पारी शिक्षणाशी स्पर्धा करण्यासाठी शाळेतल्या शिक्षकांची उमेद आता नक्कीच वाढलेली आहे.

हे नवल घडवलंय  मुख्यतः ह्या शाळेच्या पालकांनी. अनेक वर्षे ह्या पालकांनी पदरमोड करून निधी उभारला. ‘आमअवकाशी आनंदु | कोंदाटला ||  च्या मुलांना तर काही नवी शाळा मिळण्याची शक्यता दिसत नाही’ असा कोतेपणाचा विचार केला नाही. अनेक दानशूर आणि समाजहितैषी सज्जनांनी हातभार लावला. शाळेचे नव्या दमाचे माजी विद्यार्थी संचालकांच्या खांद्याला खांदा लावून सरसावले आणि पत्र्याखाली तापणारी मुलं सुखद गारवा देणाऱ्या छत्राखाली नेण्याचं स्वप्न साकार झाज्ञानसोपान - १  लं.

लवकरच शाळेच्या आवारातील कच्च्या इमारती पाडून मैदान मोकळे केले जाईल. शाळेचे बालोद्यान तळमजल्यावर असून बालोद्यानाच्या नव्या स्वरूपाबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणारच आहोत. शाळेच्या इमारतीच्या केवळ बाह्य स्वरूपातच नव्हे तर अभ्यासक्रमातही गुणात्मक सुधारणा करण्याचा निश्चय शिक्षकांनी केलेला आहे. केवळ शालांत परीक्षेचा निर्णय चांगला  लागतो  आहे ह्यावर समाधान न मानता मुलांना फक्त परीक्षार्थी न करता खरेखुरे विद्यार्थी करण्याचे आव्हान शिक्षकांनी स्वीकारले आहे.

अनेकांचं ऋणज्ञानसोपान - २  शिरावर घेऊन हा टप्पा गाठलेला आहे. शाळेच्या प्रस्तावित इमारतीचा उरलेला निम्मा भागही अजून बांधायचा आहे. तोही तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं लवकरात लवकर बांधून होईल यात शंका नाही.    


(छायाचित्रे : निशिकांत हंबीर)

Thursday, May 20, 2010

सूर्य पेरणारा माणूस

प्रवीण दवणे
आकाशाला गवसणी घालण्याची झेप असलेल्या आणि आकाशाची उंची व व्यापकता असलेल्या सतीश हावरे यांचे जीवन/लेखणीबद्ध करण्याचे काम केले ते प्रा. प्रवीण दवणे!

सतीश हावरे हे प्रंचड आत्मविश्वास, ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टीकोन असलेली व्यक्ती. बांधकाम खात्यात क्रांतिकारक बदल! अल्पगटापासून (श्रमिकांपासून) ते धनिकांपर्यंत इमारती बांधल्या. मराठी तरुणांना सतत व्यवसायाभिमुख होण्याचे मार्गदर्शन.

मराठी माणूस आणि मराठी माती यांबद्दल सतीशजींना पराकोटीचा अभिमान होता. मराठी माणूस जर अधिक ध्येयवादी होईल, अधिक प्रयत्नवादी होईल तर जग सहज पादाक्रांत करेल अशी त्यांची खात्री होती. स्वत:ला कामात झोकून द्या. मायाममतेच्या नात्यांचा आदर करा, पण त्यांचा कोश करु नका. पंख उघडून आकाशात भरारी घ्या. क्षेत्र कुठलंही असो, सर्वोत्तम व्हायचं हा ध्यास. उद्दिष्ट अन् कर्म शुद्ध असेल तर विजय तुमचाच! अशी ही सतीश हावरे या तरुण व्यवसायिकाच्या विजयगाथेचा हा प्रवास.

प्रत्येक पालक शिक्षक आणि जिंकू इच्छिणा-या प्रत्येक कोवळ्या मनासाठी! प्रत्येकानेच वाचावे असे हे पुस्तक!

पल्लवी राजाध्यक्ष
पर्यवेक्षक, मराठी माध्यम







Monday, May 17, 2010

NMM Scholarship Exam Achievements 2009-10

Out of 8 students who appeared for NMM Scholarship Exams 2009-10 following 5 students of 8th Std of Vidya Mandir passed successfully. These students were guided by our teacher Shri. S. B. Pawar. We congratulate Shri Pawar and the following successful students (From top to left, Ms. Khushboo S. Kedar, Ms. Bhavana B.Gosavi , Ms. Jagruti V. Sonar, Mst. Kunal D. Kalambate, Mst. Nishant S. Thakare)





Monday, May 10, 2010

Lesson Planning Workshop

A two day workshop for lesson planning was arranged by the Quality Development Committee in the school at the end of the academic year 2009-10.

English Language and Primary Teachers

Teachers from English Primary and Secondary as well as Marathi Primary and Secondary had participated in the workshop.  The teachers spent their last two days of the year analyzing the curricular content from 7.30 in the morning to 5.30 in the evening.    Social Sciences Group

In the workshop, the teachers attempted techniques to plan the lessons in the least possible time. Members of the school committees and the Governing Council were present to steer the activity.  Committee Members

They were grouped under four subject-heads viz. Science and Maths, Indian Languages, English and Social Sciences. Ms. Tharval, Mr. Desai, and Ms. Patil and Mr. Pawar led the Maths and Science group, while Ms. Mistry, Ms. Shimoga headed the English group. Ms. Vanmali, Ms. Dahanukar were the leaders for Marathi, Ms. Raut led the Hindi teachers.

Library Support

The teachers were supported in their endeavour by our computer and library staff. Shri. Pravin Puralkar and Ms. Megha Rane headed the library team and the computer team respectively.  The notes of workshop participants were promptly computerised thanks to the support offered by sub-staff and non-teaching participants headed by Ms. A. J. Gadgil.

Maths and Science teachers  Mr. Wagh, Mr. Bendale, Ms. Rajadhyaxa, Ms. Save and Ms. Tharval led the entire activity as school officials while Ms. Rodrigues and Ms. Churi headed the Primary Group.Hindi and Marathi

Ms. Chougule, the facilitator, had meticulously prepared for the two-day programme. Mr. Prafulla Thakare, Secretary, VPM,  Mr. Dilip Mhambrey and Mr. Rahul Kelkar, heads of the Secondary and Primary School committees respectively, along with committee members Shri. Yogesh Sangle and Shri. Ranjit Rane were a motivating presence. Shri. Vinayak Newrekar, Shri. Vasuki Haranhalli guided the computerization effort.

Computer support

Shri. Ranjan Sawant and Shri. Anil Pendharkar, Members, GC, attended the workshop and the preparatory meetings.

Saturday, May 8, 2010

YOGINI S. POLAJI (IX / A)
PERFORMANCE OF YEAR 2009-2010



1) VISAWA CHARITABLE TRUST’S:- NANDAN PANEMANGALORE DRAWING COMPETITION secured 2nd prize in the group F in the 23rd. On the spot drawing competition conferred 26th January 2010.
2) SHAILENDRA EDUCATION SOCIETY:- Shailendra Education Society, Dahisar, Mumbai organized Drawing competition after Late D.M. Samant secured – 3rd prize Group 2nd. conferred on 12 September 2009.
3) MAHARASHTRA RAJYA BALCHITRAKALA COMPETITION organized drawing competition. The Drawing was declared as ‘कला नैपुण्य’ in the group–4th conferred on 14th November 2009.
4) MUHALLA COMMITTEE MOVEMENT RUST AND MUMBAI POLICE organized Poster Making Competition Secured – 1st prize in group – 3rd. The Poster was selected for “ State Level”.
5) BOMBAY ARTS & SPORTS organised Drawing & Painting Competition secured 2nd prize. The drawing selected for Maharashtra Exhibition.
6) THE MUMBAI SURURBAN DISTRICT ATHELETIC ASSOCIATION organized Track and Field Events secured – 1st place in 4 X 100 mts Relay G/ U14.
7) DAHISAR TRACK MASTER CLUB AND DAHISAR SPORTS ASSOCIATION organized Dahisar Minithon (Marathon) 2009 secured – 3rd place in U/G 14 conferred on 6th December 2009.
8) CIART- CENTRE FOR INDIAN ART RESOURCE AND RESERCH, NEW DELHI organized – Drawing competition secured – The Drawing was declared as the “Best Drawing from all the groups” and “Best performance in Art”
Certificate was rewarded and conferred on 26th January, 2010.


Thursday, April 22, 2010

SEQUEL TO ‘MY FRIEND’

Much water has flown under the bridge. My life, my work in my class now seems fulfilling. I am now really reaching my targets. I am actually now able to teach in the class and the children are responding. Classroom situations are now fun filled and we have much more discipline in the class.

My Friend’ has now become manageable. He responds to instructions, although with a little reluctance. He looks at me when he comes into the class. He obeys when we tell him to sit in his place, gives his attendance, says ‘May I come in?’ and sometimes asks for what he wants instead of just snatching it. Of course, he speaks in monosyllables most of the time and still wants to be out on the ground in his own imaginary world. Yet I am VERY HAPPY. There has been tremendous improvement. He sometimes makes eye to eye contact and he calls me by my name. Today, he was waiting in the corridor for me to come to class. I was thrilled. Of what use are we teachers if not for the purpose of creating such learning situations that we all enjoy and look forward to.

All this change has come about because of my friend’s shadow teacher. She has come as a boon. She is a lovely girl, totally unassuming and non interfering. She concentrates on her duty. She sits with my friend at the back of the class and quietly gets the class work done. She coaxes, dissuades, persuades and promises him small ‘possible’ rewards. Whatever her strategy, it is working. Being constantly with him, she now understands him quite a lot. She has a lot of patience and handles him well.

My friend was an elephant in the drama that I had set for the Annual Day. He went confidently on the stage and said his dialogue. He stood with his friends till the end of the play. He had a field time the entire month when we were all busy practicing. Hardly any studies and lots of time to be out on the ground. Several imaginary stories would have been created. Once I saw him with a gunny sack on his back, busy searching for something. He had already created a ‘chullah’ with twigs. Mosaic tiles for plates and a long stick for a knife were in his kitchen. On asking we were told that he was going to prepare ‘chicken’ after first catching it. One day he spelt out ‘Thomas’ and ‘Friend’ on the flannel board. It turned out that, that was the latest cartoon he was crazy about. On another occasion he arranged the long individual fronds of the coconut leaf in the form of the railway tracks on which Thomas, the cartoon train would travel on.

The exams are going on and I am worried. My Friend is pretty adamant when it comes to answering the oral questions. I have to insert in my questions during his constant activity and roaming around. I get answers only if He wants to answer. I know that he knows the answers. In the English written paper I saw some new questions and answers. These were the ones that interested him. After writing these, he solved the rest of the paper.

Well, the year has come to an end. It has been a huge learning experience for me. It has been an year of surprises and fun. I wonder how my friend will fare in the years to come. He has a very inquisitive and imaginative mind. Given the right kind of environment, guidance and motivation, I am sure he will grow up to contribute something to this world. I hope he will become a scientist. Whatever may be his future but he has definitely left a deep mark on my psyche. I HAVE BEEN BLESSED

- Ms. Jyoti Honkote, Asstt. Teacher, Eng (Primary)

Wednesday, April 14, 2010

All India Open Mathematics Scholarship Examination

Results of the All India Open Mathematics Scholarship Examination conducted by IPM (Institute of Promotion of Mathematics ) on 7th Feb 2010.

Total number of students : 61 (STD V to X)

Following 6 students have been selected for National Level Final Examination which will be conducted on Sunday 11th April 2010.

(From Left Side, Kunal Joshi - VI, Soham Gurjar - VII, Saurav Surve - VIII, Omkar Masurkar - VIII, Subhash Nadkarni - VIII, Samruddhi Pednekar - VIII)