Friday, July 15, 2011

शिष्योत्तमांची मांदियाळी

शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षासाठी शाळेतील शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी शाळेला सुंदर बक्षीस दिलं. या वर्षी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती  आणि माध्यमिक शिष्यवृत्ती ह्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये चमकणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांची आजपर्यंतची विक्रमी संख्या आहे - एकूण 71 विद्यार्थी.

V. P. M'S VIDYA MANDIR – ENGLISH SECONDARY SECTION

HIGH SCHOOL SCHOLARSHIP RESULTS

(2010 – 2011)

MERIT HOLDERS

SR. NO.

Name of the Student

Marks

Rank

1

Kunal Kausturbh Joshi

262

7th

2

Pratiksha Prasad Parulekar

246

15th

3

Tejas Sadashiv Desai

240

18th

4

Prathamesh Sandeep Naik

240

18th

5

Disha Nishikant Save

232

22nd

6

Abhishek Satish Bhalerao

228

24th

7

Chirayu Prasad Kushalkar

220

28th

8

Devyani Ranjan Sawant

218

29th

9

Apurva Sanjay Kamble

216

30th

10

Shruti Hemant Chaudhary

214

31st

11

Ishani Vinay Mhatre

214

31st

12

Prathamesh Avinash Joshi

212

32nd

13

Shravani Swapnil Patil

212

32nd

14

Prashant Ramesh Chari

208

34th

15

Riddhi Rajendra Nikam

206

35th

16

Pranjali Harish Tendulkar

206

35th

17

Saiesh Rajesh Naik

204

36th

18

Bhavik Rajendra Sankhe

204

36th

19

Shreyas Rajesh Kulkarni

202

37th

20

Hardik Pradeep Pachgade

200

38th

21

Nikhil Mangesh Jog

198

39th

22

Shlesha Shirish Kamat

196

40th

23

Nilay Sunil Gawde

196

40th

24

Shubham Narendra Bhagat

194

41st

25

Mst. Abhijit Satish Bhalerao

194

41st

26

Mst. Mitesh Nandkumar Vishwasrao

192

42nd

27

Tanvi Ramesh Dalvi

190

43rd

28

Mahi Nishad Mhatre

188

44th

29

Arya Nitin Patil

188

44th

30

Manali Sunil Vichare

188

44th

31

Sarvesh Sanjay Ayare

186

45th

32

Jay Sanjay Parab

184

46th

33

Viraj Vijayendra Pai

184

46th

34

Tanvi Sadashiv Desai

184

46th

35

Anushree Anand Nayak

182

47th

36

Siddhi Madhusudan Martal

180

48th

37

Ameya Bhushan Dalvi

180

48th

Total no. of Students

76

Students Appeared

75

Absent

1

Passed

71

Failed

4

Passing Percentage

94.66%

Merit Holders

37

TEACHERS IN- CHARGE

Ms. Vaishali B. Patil

English & History

Mrs. Harshika M. Chowkekar

Maths & Science

Mrs. Poonam V. Vaidya

I.Q.

Ms. Suhasini B. Aivale

Marathi

Ms. Lathika S. Menon

Geography

(माध्यमिक इंग्रजी विभागाचे गुणवंत विद्यार्थी)

चौथीच्या आणि सातवीच्या वर्षामध्ये अनुक्रमे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी भरपूर जास्तीची मेहनत करून हे यश संपादन केलेले आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचाही ह्या यशामध्ये मोठा वाटा आहे.

ENGLISH PRIMARY SECTION

MIDDLE SCHOOL SCHOLARSHIP EXAM RESULTS

MARCH- 2011

MERIT HOLDERS

Sr.No

Name of candidate

Total marks

1

Kini Roshni Ravindra

272

2

Walavalkar Sujit Sushil

272

3

Nikam Shruti Rajendra

270

4

Ranaware Chaitanya Jayraj

270

5

Sawant Purva Prasad

268

6

Padhyegurjar Shaunak Arvind

264

7

Prabhu Shubham Keshav

264

8

Mahajan Isha Pravin

262

9

Dhogde Shriya Shriram

260

10

Sakhalkar Vaibhavi Vinod

258

11

Nayak Aditya Srinivas

254

12

Deshpande Saakshi Shrinivas

252

13

Narvekar Sahil Uttam

252

14

Raut Avnish Jayprakash

250

15

Pujari Samaa Sudhir

250

16

Yadav Sahil Roshan

246

17

Sarfare Surabhi Ashish

240

Total students appeared - 53

N0. of merit holders - 17

No. of pass students - 53

Total percentage secured - 100%

The subjects were taught by the following teachers:

1. Mrs. Jyoti Honkote - English

2. Mrs. Pratima Chawla - Intelligence

3. Mrs. Leena Namye – Maths

(प्राथमिक इंग्रजी आणि मराठी विभागाचे गुणवंत विद्यार्थी)

प्राथमिक मराठी विभागातील यशस्वी विद्यार्थी -

अ.क्र.

विद्यार्थ्याचे नांव

मिळालेले गुण

यादीतील क्रमांक

1

कु. चौधरी जयेश सतीश

276

11 वा

2

कु. गावडे मृण्मयी संजय

270

14 वा

3

कु. जायभाये हर्षल गोवर्धन

266

16 वा

4

कु. सावंत तीर्था संदेश

256

21 वा

5

कु. हळवलकर रुचिरा राजेंद्र

256

21 वा

6

कु.पाटील वेदांती अविनाश

254

22 वा

7

कु. मोरये अमेय दिलीप

254

22 वा

8

कु. सोनार संस्कृती उमेश

246

26 वा

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन २०१०-११ :

मार्गदर्शक शिक्षक :
१) सौ. नीता जयंत मोरजे
२) सौ.विनिता विनय सावंत
३) कु. सोनाली गणपत कांबळे

(माध्यमिक मराठी विभागाचे गुणवंत विद्यार्थी)

माध्यमिक मराठी विभागातील यशस्वी विद्यार्थी -

अ.क्र.

विद्यार्थ्याचे नांव

मिळालेले गुण

यादीतील क्रमांक

1

वैभव सुनिल गावडे

224/300

26

2

चैतन्य विजय खामकर

214/300

31

3

निखिल रंगनाथ गोडे

208/300

34

4

चिन्मय सुधन बापट

202/300

37

5

ओजस उदय घोणे

202/300

37

6

अक्षता संदेश तळणकर

200/300

38

7

चैताली सुधीर पांढरकामे

196/300

40

8

निनाद रविंद्र शेटये

184/300

46

9

विकास चंद्रकांत शिंदे

182/300

47

मराठी माध्यमिक शिक्षकांची नावे -:

1. श्रीमती. संपदा गुळवे

2. श्री. सयाजी तोरवणे

3. श्री. किशोर पाटील

4. श्रीमती. श्वेता संखे.

 

एकूण विद्यार्थी संख्या  - 50

उपस्थित विद्यार्थी संख्या - 49

अनुपस्थित विद्यार्थी संख्या - 1

उत्तीर्ण विद्यार्थी संख्या - 38

अनुत्तीर्ण विद्यार्थी संख्या - 11

शिष्यवृती धारक विद्यार्थी संख्या – 09

 

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन !

Speech by our student on foundation day

‘Our respected teachers and my dear friends’

It is a very special day at school today, School Foundation Day. It falls on the 18th of June every year. Would you like to know why this particular date has been chosen? Because, it is the day when our school started its journey 50 years back with just 89 students. Our school was the first non municipal school of Dahisar built by residents of Dahisar for the local children. Before 1962, the children from Dahisar used to go to distant schools often involving railway travel. So, may I first of all pay the gratitude on behalf of all the students to the founder members of the school. Without these noble minds and their sincere efforts, we would not have been sitting here in this temple of knowledge for celebrating the ‘Golden Jubilee’ year of the school.

The temple of knowledge kept expanding room by room starting with 89 secondary marathi students in 1962 then to pre-primary sections in 1972 then to primary sections in 1982 then to all the sections of both the mediums in 1992 and now to new school building accommodating 5000 students. The school has been trend setter and has played a leading role for the aspiring student community.

The most important fundamental that I like about my school is the mission of our school i.e. “Prajwalito Dyanamay Padeepaha” which means “a lamp of knowledge had been lit and that all may bathe in its sight”. The school has been successful in this mission all along the years by providing all round development of the children. There are many big schools in Mumbai which charge big fees to the students, but I can proudly say that our school is the only school in my knowledge which provides education to socially deprived class.

Avani V. Newrekar The school has been successful in creating talents in different parts of the society in the roles of engineers, doctors, artists, actors, and politicians. This achievement is possible only with the capable teachers and the love and care that they show towards the students. On this occasion, we must express deep gratitude to all our teachers who help us learn not just the lessons from the books but also qualities that make good human beings. The manners and the opportunities that they provide help us to show and develop the hidden talents and skills. This is the reason why this school is also known as “Samannanchi Asamanya Shala”

Dear Friends, just like other ex-students, we also should aim to contribute to the school development after passing out from the school. This is the only way we can make our school more better. Fellow students, it is not just enough to say “Thank You” to our school. The best way we can show our gratitude is to grow into worthy citizens of this nation and this world.

Avani V. Newrekar, Std. VII-B

Unique School.

Honorable teachers and my dear friends,
It gives me immense pleasure to be speaking on this occasion of our school foundation day.

It was 18th June in the year 1962 that our school started with only 84 students in a tiny shed. The upcoming year is therefore the 'Golden Jubilee' year of our school.
From 84 students in 1962 to 4500 in 2011, our school has a long way. Our school is unique in many ways.

It was founded by the locals of Dahisar at entirely their own expense. Great and humble people like Mr.Tare, Mr.Patil and Mr.Kini donated land for purpose of making a school. Do you know why? It was because Dahisar never had secondary school at that time and had to travel places as far as Vile Parle by trains for a good education. Students suffered accidents in train travels and only way to stop this was to have a school in Dahisar.

The school's founder members honorable, Shri.Thakur, Rane, Raote, Parab, Thakre went door to door and collected funds and raised the school's initial structure. Ever since 1962, our school is managed by the locals of Dahisar for the people of Dahisar. That is another unique feature of our school.

Many of the ex students of our school are the part of managing board of our school. That is the third unique feature of our school.

What's more…….the kind of airy classrooms, the size of playground our school has is rare to find in Mumbai's suburbs.

The level of extra curricular anSuchitra V Haranhallid sports activities our school has is also in comparable with best of the schools in Mumbai.

Over the past 49 years, VPM's Vidya Mandir Dahisar has transformed from the school to a social movement.Ex students of this school have excelled in various walks of life, making the school proud. Amongst the ex students we have virtually everyone from MLAS to commissioned defense officers, IITANS and doctors.

I am proud to be students of this school. I am also glad to be associated with such caring and dedicated teachers.

I understand that we, as a student can best advertise for the school by being successful in our own careers. On this occasion we promise our teachers to put best possible efforts as students to bring glory to our school. I thank all my teachers for having given this opportunity to speak and also all of you for giving me patient hearing.

Suchitra V Haranhalli. Std. VII A

Friday, June 24, 2011

मुलांचे आरोग्य

   
                              - डॉ. सौ. वसुंधरा नाटेकर

आपल्या सर्वांच्या, विशेषकरून आई-आजी झाimageलेल्यांच्या एका जिव्हाळ्याच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत.  भरण-पोषणाची जबाबदारी निसर्गत:च स्त्रीवर्गाकडे आलेली आहे.  या पृथ्वीतलावरील यच्चयावत्‌ प्राणीमात्रांच्या, (म्हणजे मनुष्यप्राण्यासकट !) उदरभरणासाठी पृथ्वी म्हणजे जमीनच अन्नधान्य पिकवते.   सर्वांचा भार सहन करणारी ही 'सर्वसहा पृथ्वी', ही वसुंधरा आपल्या सर्वांचेच पोषण करते, तशाच आपणही सर्वजणी आपले बाळ आपल्या गर्भात असताना आपल्या रक्तामांसाने त्याला पोसतो आणि तो जन्मल्या दिवसापासून अगदी आपल्या अखेरपर्यंत म्हणजे आपण म्हातारे होईपर्यंत एका गोष्टीविषयी सतत काळजीत असतो की आपला 'तो' किंवा 'ती' पोटभर जेवला की नाही !  कारण आपली मुले कितीही मोठी झाली तरी आपल्यासाठी ती मुलेच असतात, आणि आपल्यापेक्षा लहानच असतात.  अगदी आपल्या कर्त्या मुलाची काळजी घेणारी त्याची हक्काची, प्रेमाची बायको आली तरी आपल्या मुलाच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत आई नेहमीच काळजीत असते !


थोडक्यात, काळानुसार आपल्या राहणीमानात, विचारात-आचारात कितीही बदल झाला तरी एक गोष्ट शाश्वत आणि सत्य आहे की मुलाने खाऊन पिऊन भरल्यापोटी ढेकर दिला तरी ते पाहून समाधानाचा नि:श्वास टाकणारी ती आईच असते.  आणि लहान मुलांच्या बाबतीत म्हणाल तर आपले बाळ कटकट न करता पोटभर जेवले तर त्या तृप्तीचा पहिला ढेकर मनोमन देते, ती आईच !  अगदी दिवसाचे सार्थक झाल्यासारखे तिला वाटते !


    लहान मुलांच्या बाबतीत भेडवसावणारे प्रश्र्न म्हणजे -माझा मुलगा अगदीच बारकुडा आहे, तो काही खात नाही, शेजारच्या राहुलपेक्षा अगदीच हाडकुळा आहे;  माझा मुलगा भात-पोळी खात नाही, भाजी तर त्याला डोळ्यासमोर नको ! कोशिंबिरीला हात लावत नाही, कुठलंच फळ त्याला आवडत नाही; सारखी गोळ्या-चॉकलेटं खातो.  डॉक्टर, त्याला भुकेसाठी काही टॉनिक लिहून द्या ना !  अभ्यासातही अगदीच 'ढ' आहे,  एखादं बुध्दीचं टॉनिक आहे कां हो ?- या आणि कितीतरी प्रश्नांचे भुंगे आपल्या डोक्यात भिरभिरत असतात, त्यामुळे आपण  अस्वस्थ होतो, त्याबद्दल आपण स्वत:च जवाबदार आहोत अशी समजूत करून अपराधीपणाची भावना आपल्याला स्वस्थ बसू देत नाही, हे खरे आहे, पण मी देखील तुमच्यापैकीच एक म्हणजे प्रथम आई आहे आणि जोडीला वैद्यकीय व्यवसायातील अनुभवाने आलेला काहीसा शास्त्रीय दृष्टीकोन आहे.  'आई' ही पालकत्वाची पहिली पदवी पार पडली आहे आणि आता 'आजी' च्या पद्‌व्युत्तर परीक्षेचा अभ्यास सुरू आहे तेव्हा ही सर्व जमेची बाजू धरून मी बोलणार आहे.  


    आजचा मूळ विषय आहे, 'मुलांचे आरोग्य'. विषयांची व्याप्ती खूप मोठी आहे.  आरोग्य म्हणजे केवळ शारिरिक स्वास्थ्य नव्हे तर शारीरिक आरोग्याच्या बरोबरीने मानसिक आरोग्याचा ही विचार करणे म्हणजे संपूर्ण आरोग्य !  काळाच्या ओघात हळूहळू लोप पावत चाललेली आपली सांयप्रार्थना आठवा -


'शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धिविनाशाय, दीपज्योति नमोस्तुते ।।

हे दीपज्योती, मी तुला नमस्कार करते-कशासाठी ? शुभ-कल्याण करण्यासाठी, आरोग्य, धन-संपत्ती प्राप्त होण्यासाठी, दुष्टबुध्दीचा नाश करण्यासाठी ...! इथे 'आरोग्य' या शब्दाला किती प्राधान्य दिले आहे पहा !  कारण आरोग्य असेल, तर धन, संपत्ती ... सर्व आपोआप सहजपणे प्राप्त होते. 

दुसरे एक वचन -'शरीरमाद्यं खलुधर्मसाधनम्‌।' म्हणजे सद्‌धर्माचे आचरण, धर्माची प्राप्ती करण्यासाठी शरीर हे मुख्य साधन आहे. 

एकूण  आरोग्याचे अनन्यसाधारण महत्व आपण सर्वजण  ओळखून आहोत.
    आज मुलांच्या शारीरिक आरोग्याविषयी चर्चा करूया. यामध्ये प्रामुख्याने मुलांचा आहार म्हणजे खान-पान सेवा, विहार म्हणजे त्यांचा व्यायाम, खेळ, झोप, विश्रांती, इतर आवड, छंद, त्यांचा आरोग्यदायी, स्वच्छतेच्या सवयी, सद्‌वर्तन... असे बरेच काही त्यात येते.  अलीकडे मुलांना दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या आजारांच्या प्रतिबंधक लसी (व्हॅक्सीन्स्‌) यांचाही त्यांच्या आरोग्यात महत्वाचा वाटा असतो.  कारण या लसी म्हणजे मुलांची कवचकुंडले आहेत.
    आपल्या जन्मापासून अखेरपर्यंत आपल्याला सात्म्य झालेली संवयीची गोष्ट म्हणजे आपले अन्न; किंबहुना या अन्नावरच आपण वाढत असतो.  इथे एक महत्त्वाचा फरक तुमच्या लक्षात आणून द्यावासा वाटतो, तो म्हणजे वाढ आणि विकास या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. आपण शब्दप्रयोग असा करतो- 'मुलांची शारीरिक वाढ' आणि 'मुलांचा सर्वांगीण विकास.'   वाढ ही संख्यात्मक बाब आहे.  म्हणजे शरीराची वाढ होते ती वजनात, उंचीत किंवा इतर अवयवांच्या आकारमानात मात्र विकास हा गुणात्मक आहे.  मुलांची ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रियांची मुख्य कार्य योग्य व चांगल्या प्रकारे होतात की नाही, यावर त्याच्या विकासाची गती अवलंबून असते.  तात्पर्य म्हणजे आपल्याला आपल्या मुलाची शारीरिक वाढ आणि त्याच्या बुध्दीचा विकास चांगला व्हावा ही अपेक्षा असते.  यासाठी मुलांच्या आहाराकडे जितक्या आपुलकीने आपण लक्ष देतो, तितक्याच कळकळीने त्याचा व्यायाम, खेळ, झोप, सवयी, छंद याकडेही डोळसपणे पाहणे गरजेचे आहे.
    आता आहाराविषयी जुजबी शास्त्रीय माहिती घेऊया.  आपले शरीर कार्यरत राहाण्यासाठी आवश्यक असणारी उर्जा आहारातून मिळते.  आहारातील महत्त्वाचे घटक आपल्याला माहीत आहेत.


1.    पिष्टमय पदार्थ-कर्बोदके-Carbohydrates
2.    नत्रयुक्त पदार्थ-प्रथिने- Proteins
3.    स्निग्ध पदार्थ -चरबी - Fats
4.    जीवनसत्त्वे-    Vitamines -अ,ब,क,ड,ई
5.    क्षार- Minerals
6.    पाणी- Water


    या आहारघटकांचे प्रमुख कार्य- शरीराला ऊर्जा पुरवणे, शरीराची  झीज भरून काढणे, शरीराची वाढ करणे, शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणे.  थोडक्यात शरीरवाढीसाठी आणि ते निरोगी ठेवण्यासाठी या सर्व घटकांचा समावेश आपल्या रोजच्या आहारात असणे आवश्यक आहे.  ऊर्जा म्हणजे थोडक्यात इंधन शरीरव्यापारासाठी लागणारी उर्जा मोजण्याचे परिमाण म्हणजे कॅलरी.  हा शब्द आपल्या परिचयाचा असेल. 1 लीटर पाण्याचे तपमान 10सेंटिग्रेडने वाढविण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला आहारशास्त्रात कॅलरी म्ह्नणतात.  श्रमाची कामे करणाऱ्याना बैठे काम करण्यांपेक्षा जास्त ऊर्जा/जास्त कॅलरी लागतात.  आपल्या मुलांचे वय (31/2 ते 6 ) लक्षात घेता, यांची वाढ होत असताना ती सतत धावत-पळत-खेळत असतात.  त्यांच्या दृष्टीने ते श्रमाचेच काम आहे.  या वयात त्यांचे शरीरही झपाट्याने वाढत असते, त्यामुळे त्याना जास्त ऊर्जा लागते.  ही ऊर्जा म्हणजेच कॅलरीज्‌ ते आपल्या आहारातून घेत असतात.  या वयातील मुलांची दिवसभराची गरज 1690 कॅलरीज ची असते.
1.पिष्टमय पदार्थ-कर्बोदके मिळणारे पदार्थ म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, ग़ूळ, साखर, साबुदाणा, केळी, आंबा, द्राक्षे, सुकामेवा - यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
2.प्रथिने-दोन प्रकारची.  वनस्पतिजन्य व प्राणिजन्य.
वनस्पतिजन्य म्हणजे कडधान्ये व डाळी पासून मिळणारी प्रथिने प्राणिजन्य म्हणजे मांस, मासे, अंडी, दूध यापासून मिळणारी प्रथिने.  प्रथिनांमुळे शरीराची झालेली झीज भरून निघते व वाढ होते, शरीर सुदृढ होते, म्हणून याना Body builders म्हणतात.
3. स्निग्ध पदार्थ-चरबीयुक्त पदार्थ-सर्व तेले, लोणी, तूप, मांस, मासे, सुका मेवा.
यामुळे देखील शरीराची वाढ होते, शरीराची उष्णता राखली जाते, हार्मोन्सची निर्मिती, पेशींच्या बाह्य आवरणाची निर्मिती होते.
4.जीवनसत्त्वे-रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.  शरीरक्रिया सुरळीतपणे पार पाडल्या जातात.
'अ' - गाजर, दूध, पालेभाज्या, लालभोपळा, पपई, आंबा यासारखी गडद रंगाची फळे.
'ब' - दूध, दुधाचे पदार्थ, सोयाबीन, धान्यांचा कोंडा, कडधान्ये, सुकामेवा
'क' - लिंबू, संत्रे, मोसंबी, आवळा, टोमॅटो
ड - दूध, दुधाचे पदार्थ, मासे, सूर्याचे कोवळे ऊन
ई - पालेभाज्या, तेलबिया, वनस्पतीजन्य तेले, सोयाबीन ,मका, गव्हांकुर
5. क्षार - लोह-(रक्तवाढीसाठी), कॅल्शियम(हाडे व दात मजबुती)
           सोडियम, पोटॅशियम
6. पाणी - सर्व द्रवपदार्थ, रक्ताचा पातळपणा टिकवते, अन्नाचे पचन करण्यासाठी. तात्पर्य, या सर्व पदार्थांचा आपल्या आहारात समावेश हवा.  अर्थात ऋतुमानानुसार शरीराला गरज असेल त्याप्रमाणे आहारात बदलही करावा लागतो.
    आहाराविषयी एवढी माहिती घेतल्यानंतर या 31/2 ते 6 वर्षाच्या मुलांच्या आहाराविषयी सविस्तर बोलू.
    दिवसभरात तीन वेळा पोटभर जेवण म्हणजे सकाळी भरपेट नाश्ता, दुपारी जेवण व रात्री जेवण आणि मधल्या वेळेचे खाणे दोन वेळा, असे एकूण दिवसभरात पाच वेळा मुलानी खावे.  अर्थात त्यांच्या शाळेची आणि भुकेची वेळ यांची सांगड घालून आईने कल्पकतेने त्याची आखणी करावी.  याबाबत आईसारखा मॅनेजमेंट गुरु दुसरा नाही !
    सकाळचा नाश्ता पोटभरीचा हवा.  त्यासाठी शिरा, उपमा, पोहे, घावन, परोठे देणे उत्तम.  बरोबर एखादे केळे किंवा कोणतेही फळ दिले तरी चालेल.  हो, दिवसभरात 1 तरी फळ मुलांच्या पोटात जायला हवे.
    दुपारच्या जेवणात भात-वरण किंवा आमटी, पोळी-भाजी, कोशिंबीर, आठवड्यातून 2-3 वेळा आवडीची खीर किंवा मुरांबा द्यावा.  इथे मला एक सुचवावेसे वाटते की, जेवणाचे ताट अशाप्रकारे वाढावे की ते बघताक्षणी मुलाला जेवावेसे वाटेल.  म्हणजे ताटातील पदार्थांची रंगसंगती असावी .  म्हणजे पांढरा भात -लालसर आमटी, डाव्या बाजूला काकडीची कोशिंबीर, उजवीकडे बटाट्याची पिवळी भाजी, तर कधी पांढऱ्या भातावर पिवळे वरण, डावीकडे लाल टॉमेटोची कोशिंबीर, उजवीकडे लाल रस्सा किंवा हिरवी भाजी... असे रंगीबेरंगी सजलेले ताट पाहून सर्वात प्रथम डोळे तृप्त होतात; मग त्याच्या वासाने घाणेंद्रिय तृप्त होते, मग रसना म्हणजे जीभ त्या अन्नाचा आस्वाद घ्यायला अधीर होते.  मग हाताने स्पर्शाने ते सुखावत आणि पटपट जेवते !  एक राहिले; मुलाला जेवण्यासाठी बोलावणारी पहिली हाक प्रेमाची असेल तर ती ऐकून मुलाचे कर्णेंद्रिय ही सुखावते !  एकूण काय, तर मूल पंचज्ञानेंद्रियांनी जेवते आणि तेच त्याच्या  अंगी लागते, कारण ते खरे तृप्त होते !  रात्रीचे जेवण दुपारप्रमाणेच पण थोडे फेरफार करून असावे, खूप उशिरा त्याला जेवायला देऊ नये.  नाहीतर नीट पचन होत नाही.
    आता मधल्या वेळच्या खाण्याचे लाडू रोज रोज मधल्या वेळी काय खायला द्यायचे हा यक्षप्रश्र्न असतो.  मी असे सुचवेन की येता जाता खाण्यासाठी भाजलेले चणे-शेंगदाणे, कुरमुरे, घरी केलेली शेव, शेंगदाणा-खोबरे, तीळ, चण्याची डाळ, राजगिरा यांची चिकीचा किंवा साधा गूळ घालून केलेली चिक्की-यामधून चांगले प्रोटीन्स मिळतात. फ्रूटचाट; फळांमध्ये मोड आलेले मूग, उकडलेले हरभरे ,बटाटा, रताळे; कांदा-कोशिंबीर, मीठ-मिरपूड घालून केलेला मिक्स चाट; या सर्व वस्तूंमध्ये चुरमुरे व थोडी शेव घालून केलेला मिक्स चाट; या सर्व वस्तूंमध्ये चुरमुरे व थोडी शेव घालून किसलेले गाजर, कोथिंबीर, आंबटगोड चटण्या यापासून केलेले भेळ, ही देखील चटकदार लागते, मुलांना आवडते.  याशिवाय भूकलाडू, तहानलाडू म्हणून प्रसिध्द असलेले गव्हाच्या कणकेचे गुळाच्या पाकात केलेले लाडू, गूळपापडी; खोबऱ्याच्या, गाजर-दुधीच्या वड्या; असे अनेक प्रकार आणि जोडीला लिंबू, कोकम,आवळा यांची सरबते ही अधून मधून देता येतील.
    आपल्याला सोबत एका कागदावर,मला सुचलेल्या आणि वापरलेल्या काही झटपट पाककृती (खास मुलांसाठी करण्याच्या) लिहून दिल्या आहेत.  त्यांचा हे वापर करावा.
    मला माहीत आहे, तुम्ही म्हणाल, 'करता खूप येईल पण वेळ कु ठे आहे ?' पण आवड असेल तर सवड मिळते.  पुरुषांच्या हृदयाचा मार्ग त्यांच्या उदरातून जातो, हे आपण सतत ऐकत आलो आहोत, पण मला वाटते, पुरुषांच्याच नव्हे तर सगळ्यांच्याच हृदयाचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो.  म्हणूनच मुलांच्या मनाचा ताबा घ्यायचा असेल तर आधी त्यांचा पोटोबा शांत करायला हवा.  आपल्या वेळेचे थोडेसे नियोजन, आणि काही गोष्टींची पूर्वतयारी करून ठेवली तर सगळे काही सुकर होते, हा माझा अनुभव !
    आता मुलांना काय देणे टाळावे ते पाहू या - मुलाना आवडणारी बिस्किटे-चॉकलेट, गोळ्या, शीतपेये, हवाबंद केलेले फळांचे रस यामध्ये  Preservatives म्हणून काही रासायनिक द्रव्ये टाकली जातात.  त्यांची बऱ्याच मुलांना ऍलर्जी असू शकते.  तसेच या रासायनिक प्रकिया करताना त्यातील पोषणद्रव्ये नाश पावतात.  त्यामुळे ती अपायकारक असतात.  फळांचे रस पिण्यापेक्षा  फळ खाणे चांगले, कारण त्यामधून फायबर म्हणजे चोथा मिळतो, जो आपल्या शरीरशुद्धिसाठी आवश्यक असतो.
    वेफर्स, फरसाण, फास्टफूड (पिझ्झा- वगैरे...) यामध्ये वापरलेली तेले व मीठ यांचे प्रमाण खूप असते आणि ते वाढत्या वयासाठी तसेच आरोग्यासाठी धोकादायक असते.  म्हणून नेहमी देऊ नये.  मात्र त्याविषयी  craving   म्हणजे खाण्याची तीव्र इच्छा टाळण्यासाठी मुलाला काही खास प्रसंगी, अधून -मधून गमंत म्हणून द्यायला हरकत नाही.
    डायबेटीस, ह्रदयविकार, उच्चरक्तदाब या जीवघेण्या व्याधीची पाळे-मुळे, बीजे, लहान वयातच पेरलेली असतात.  त्याला कारण म्हणजे खाण्यापिण्यातील असमतोल म्हणजेच संतुलित आहार ( Balance diet) न घेणे, जंकफूड-फास्टफूड म्हणण्यापेक्षा नाहक भीती, टी.व्ही-व्हिडिओ-कंप्यूटर यांचा अतिप्रभाव !
    तेव्हा आपले मूल भविष्यात अशा गंभीर आजाराना बळी पडू नयेत म्हणून या लहान वयातच त्याना दैनंदिन जीवनातील खाण्यापिण्याच्या, वागण्याच्या, अारोग्याच्या चांगल्या संवयी लावल्या पाहिजेत कारण साधारण 3 ते 8-10 वर्षापर्यंतचा क़ाळ म्हणजे मुलांचे अत्यंत संवेदनाक्षम, संस्कारक्षम असे वय.  या वयात वयात ते जे आत्मसात करतील त्यावर त्याच्या उभ्या आयुष्याची इमारत उभी असते.
    आहारानंतर येतो तो व्यायाम म्हणजे खेळ.  हे वयच खेळण्या बागडण्याचे असते.  त्यामुळे रोज संध्याकाळी किमान एक तास तरी मूल मोकळ्या हवेत खेळले पाहिजे.  त्यामुळे होणाऱ्या व्यायामामुळे त्याचे स्नायू, सांधे, हाडे बळकट, मजबूत होतात, भरपूर प्राणवायू मिळाल्याने रक्ताभिसरण सुधारते.  पेशी ताज्यातवान्या होऊन कामाचा (म्हणजे मुलांच्या अभ्यासाचा) उत्साह वाढतो.  मन प्रसन्न राहाते.  साहाजिकच त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर चांगलाच होतो.  त्यांची आकलनशक्ती, स्मरणशक्ती वाढते.  याशिवाय सर्वांशी मिसळून राहिल्याने सहभावना, सहकार म्हणजे मदतीची भावना, समंजसपणा, सहनशीलता, वाढते.  सूर्यनमस्कार हा व्यायामाचा एक उत्तम प्रकार आहे.
    विश्रांती -याचीही मुलाना गरज असते.  त्याच्यासाठी झोप हीच विश्रांती.  झोपेमुळे मुलांच्या थकलेल्या शरीराला विश्रांती मिळते आणि मेंदू आपले काम उत्तम प्रकारे करण्यासाठी सज्ज होतो.  या वयातील मुलांसाठी कमीत कमी 8 तास झोप हवीच.  झोप पूर्ण झाली तर त्याचा बुध्दीवर चांगला परिणाम होतो; पर्यायाने अभ्यास चांगला होतो.  तसे दिवसा झोपणे आरोग्यासाठी हितकर नाही, मात्र 31/2 -4 वर्षाच्या मुलानी दुपारी 1-11/2 तास झोपावे हे उत्तम.  सध्याच्या ग्रीष्म ऋतूत सर्वांनीच 1/2 तास झोपावे, असे आयुर्वेदशास्त्र सांगते.
    या वयातच मुलाना हळूहळू वाचनाची सवय लावावी.  स्तोत्रे, प्रार्थना, उजळणी या कालबाह्य होत चाळेेलल्या गोष्टींची पुन्हा आठवण करून द्यावीशी वाटते.  कारण स्तोत्रपठण, उजळणी यामुळे आपली स्मरणशक्ती शाबूत राहाते, वाणी स्वच्छ-शुध्द होते.
    आता आरोग्यदायी संवयीविषयी बोलताना प्रथम जेवणासंबंधी सांगते
* मुलाला भूक लागली असेल तेव्हा आणि तेव्हाच त्याला जेवायला , खायला द्यावे.  भूक नसताना किंवा भुकेची वेळ टळून गेल्यानंतर खायला देऊ नये.
* मूल जेवत असताना त्याच्या अभ्यासासारखा अप्रिय विषय किंवा अन्य कारणाने त्यावर तोंडसुख घेऊ नये.  त्यामुळे मूल नाराज झाले तर पाचकरस निर्माण होण्यात अडथळा येऊन पचन नीट होत नाही.
* मुलाला घाईघाईत खाण्याची संवय लावू नये.  तसेच अगदी रेंगाळत जेवणेही चांगले नाही.
* दिवसभरातील एक तरी जेवण सर्व कुटुबीयांबरोबर होईल असे पहावे.
* "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' याचे भान ठेवावे !

आरोग्यदायी संवयीमध्ये दांताची काळजी महत्त्वाची आहे.
* दिवसातून 2वेळा म्हणजे सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी असे 2 वेळा दात घासण्याची संवय मुलाला लावावी.
* काहीही खाल्ल्यानंतर चूळ भरावी.
* चिकी किंवा गोळीचॉकलेट सारखे गोड व चिकट पदार्थ खाल्ल्यावर मुलाचे दात घासून खळखळून चूळ भरावी.
* कुटुंबातील प्रत्येकाने ही शिस्त सांभाळावी.
* दर 6 महिने/1 वर्षाने दंतवैद्यांकडून मुलाचे दात तपासून घ्यावेत.

अन्य संवयी -
मुलाचे/मुलीचे केसांवर तेल घालून विंचरून भांग पाडून/वेणी घालून शाळेत किंवा बाहेर पाठवावे.
नखे नियमितपणे कापावीत.
मुलांच्या कानांची स्वछता करावी.
मुलांना दररोज दूध पिण्याची संवय असेल तर उत्तमच परंतु एखाद्या मुलाला दुधाचा तिटकारा असेल तर त्याला दुधासाठी फार आग्रह धरू नये.  मात्र इतर आहार व्यवस्थित आहे ना, याकडे लक्ष द्यावे.
    मुलांच्या आरोग्याविषयी बोलू तेवढे थोडेच आहे.  एवढे मात्र निश्र्चित की त्यांच्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतली तर भविष्यात काळजी करण्यासारखे काही उरणार नाही, कारण लहानपणीचे जपलेले आरोग्य ही त्याची आयुष्यभराची शिदोरी असेल !

Monday, October 25, 2010

सुजाण पालकत्व

मातृदेवो भव । पितृदेवो भव ।
भारतीय संस्कृतीचा ठेवा, हे आता फक्त लिहून वाचण्यापर्यंत शिल्लक राहिलेले आहे. पण आजचा विद्यार्थी खरेच असा का बनत चालला आहे? याचा खोलवर विचार केल्यास भूतकालीन आयुष्याची चित्रे उलगडून स्मरणात येते की, पूर्वी एकत्र कुटुंबामुळे आईचे नाते, बाबांचे नाते सहवासातून, स्पर्शातून, संवादातून गहिरे असायचे. मुलांना आई-वडिलांची  ओढ असायची. आई कितीही कामात असली तरी ‘घार उडते आकाशी मन असे पिल्लाशी’ म्हणीप्रमाणे आई मुलांची नजरानजरही गोड वाटायची.
आजची स्थिती आई, बाबा, दोन मुले असे विभक्त कुटुंब त्यात आई-बाबा दोघेही नोकरीच्या निमित्ताने बाहेर. पाल्यासाठी वेळ देऊ शकतो का? पाल्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेम निर्माण असण्यासाठी आपण कोठे कमी पडता? पैशाने सर्व सुखे मिळत नाहीत. काही वेळा शब्दांचा दिलासा, कौतुकाची थाप व मुलांच्या कुतुहल बुद्धीचे, शंकांचे निरसन या गोष्टींचेही पालकांनी पाल्याचे स्वागत करावे. कधी रागावणे, कधी धाक दाखवणे, कधी त्याचा मित्र बनून खेळणे, कधी त्याचा नवीन विषयाचा अभ्यास घेणे, निदान शाळेतलाच अभ्यास पुन्हा घेऊन पक्का करणे, हे महत्त्वाचे आहे.
आजच्या शिक्षणात आणखी वाढते विषय भरीस पडले आहेत. जसे मूल्य शिक्षण, सामान्य ज्ञान, पर्यावरण, संगणक, व्यक्तिमत्त्व विकास शिक्षणाचा दर्जा उंचावत चाललेला आहे. उच्च स्तरावर शिक्षणाची पातळी वाढत चालली आहे. उंचावलेला हा वटवृक्ष फांद्यांचा एकमेव आधार आहे. शाळेत विद्यार्थी 5 ते 6 तास असतो. वर्गातील 70 ते 75 मुलांना काही-काही मिनिटांत तो विषय अभ्यासक्रमाप्रमाणे संपवायचा असे बंधन असते. मनात असूनही शिक्षकांना विषयांचे सविस्तर शिक्षण विद्यार्थ्यांना देणे वेळेअभावी शक्य नसते. अशावेळी 24 तासांतील 5 ते 6 तास शाळा, 8 तास झोप व उरलेल्या तासांत पालक काहीतरी वेळ पाल्यासाठी नियोजनपूर्वक मनात असेल तर काढू शकतात. सुट्‌ट्यांतही ते पाल्याला काही शिकवू शकतात. निदान नवीन विषयांची जाण पाल्याला अधिक माहितीपूर्वक देऊ शकतात. जरी शाळेत, शिकवणीत विद्यार्थी शिकत असला तरी घरच्या शिक्षणातही सहभाग असणे आजच्या स्पर्धात्मक युगात जरुरीचे आहे. विद्यार्थ्यांना टीव्हीवरील शैक्षणिक कार्यक्र्रम दाखवायला हवेच, पण सर्वच कार्यक्रम आवश्यक नाहीत. शैक्षणिक कार्यक्रम दाखविल्यास त्याचा फायदा होईल व इतर कार्यक्रमांचे दुष्परिणामही कमी होतील व वेळही सार्थकी लागेल.
पालकांनी आपल्या पाल्यासाठी शाळेत 15-15 दिवसांनी शिक्षकांना भेटायला हवे. पाल्याचे मित्र कोण? वर्गात त्याचे लक्ष कितपत असते? गृहपाठ वेळेवर करतो का? त्याचे वागणे, बोलणे, राहणे, आहार या सर्व बारीक गोष्टींतूनही पालकांनी जागृत असावे. घरच्या वातावरणातील संवाद एकमेकांसाठी सहकार्याची भावना, घरातील प्रत्येक माणूस कुटुंब, समाज, मग देश हे सारे माणुसकीचे माणूस म्हणून जगण्यासाठी, पुढची पायरी भविष्यकाळात उज्ज्वल दिशा होण्यासाठी आजची पिढी आजच्या भक्कम पायाचा खंबीर आधार, मजबूत मूल्यांच्या संस्काराचे शिक्षण हृदयात जतन करायला पाहिजे, तरच शिक्षणाचे उद्दिष्ट सफलपूर्ण होईल.
स्पर्धायुगातील टक्केवारीत सूडाची भावना व्यक्त होऊ न देता प्रत्येकाला स्पर्धा ही जीवनासाठी हितकारक आहे, अशी मनाची धारणा ठेवल्यास, समाधानाची शिदोरी पाल्यास दिल्यास पालकत्व चिरंतन मूल्यांचे वाटेल, यात शंका नाही. सरळ-सरळ जीवनाला सामारे जाण्याची ताकद निर्माण करण्याचे काम पालकांचे आहे.
तत्त्वज्ञानाच्या उच्च भाषेपेक्षा प्रेमाची भाषा, आपुलकीची भावना जास्त जवळची वाटेल. आजचे शिक्षण विद्याथ्यांचे कुवतीबाहेरचे आहे. तरीही त्यांची कुवत व्यवस्थित असण्यासाठी पालकांनी मेहनत घेणे जास्त गरजेचे आहे. चंदनासारखे झिजल्यावर सुगंध दरवळतोच, पण आधी झिजण्याची क्रिया व्हावी लागते.
मुले ही तर निरागस, निष्पाप असतात. त्यांना वेळीच घडवणे, आकार देणे हे पालकांच्या हातात असतो. जसे पेरावे तसे उगवते या उक्तीप्रमाणे व्यवस्थित खतपाणी घातल्यास पाल्यांची उज्ज्वल पहाट नक्कीच उजाडेल.
"मुले ही फुले" असे नेहमी नेहरूजी म्हणत. सुंदर फुले, गोड फळे मिळण्यासाठी आधी कष्ट करावे लागतात. मगच त्यांचा आस्वाद सुखकारक वाटतो. संस्कारांच्या खतपाण्याची जबाबदारी पालकांची असते.
आजचा विद्यार्थी पालक व शिक्षकांचा आदर तेव्हाच करील जेव्हा दोघांचेही त्याला मार्गदर्शन लाभेल. कितीतरी वेळा मुलांना यश मिळाल्यावर ते नेहमीच मुलाखतीत आपल्या आई-वडिलांचे व गुरुंचे श्रेय, आशीर्वाद म्हणूनच मी आज काही करू शकलो असे सांगतात. त्याचे कारण मुलांच्या अनुभवांतून त्यांचे उद्‌गार आनंदाने बाहेर पडतात. आई-वडिलांनाही मग मुलांबद्दल अभिमान वाटतो.
म्हणूनच सुजाण, सुशिक्षित, आदर्श पालकत्व होण्यासाठी पाल्याचे जीवन सार्थकी लावणे, त्यांच्या शिक्षणात हातभार लावणे पालकांची जबाबदारी व कर्तव्य आहे.

-    सौ. श्वेता सं. संखे

Tuesday, October 19, 2010

शाब्बास ! आगे बढो !

आमच्या दोन माजी विद्यार्थिनी आणि इयत्ता 9 वी मध्ये शिकत असलेला एक आजी विद्यार्थी ह्यांच्या सुयशाने आम्ही हरखून गेलो आहोत.

तीन शिलेदार 

कु. आकांक्षा राणे - (शालान्त परीक्षा 2005)

आकांक्षा मुंबई विद्यापीठाचा बीएससी 2010 परीक्षेत गणितात 91% गुण मिळवून सर्वप्रथम आली आहे. आता गणितातच संशोधन करून डॉक्टरेट मिळवण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे.कु. आकांक्षा राणे

 

एसएससीपासूनच कोणत्याही कोचिंग क्लासला न जाणारी आकांक्षा, सुप्रसिद्ध गणितज्ज्ञ आणि "इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' चे भूतपूर्व संचालक डॉ. व्ही. व्ही. राणे ह्यांची कन्या आहे.

कु. मृदुला कुलकर्णी - (शालान्त परीक्षा 2003) मृदुलाने "वेदान्त शास्त्रा'मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एम.ए. 2010 परीक्षेत सुवर्णपदक मिळवलेले आहे. कु. मृदुला कुलकर्णी

मृदुलाचा शास्त्रीय संगीताचाही अभ्यास असून संस्कृत श्लोक गाण्याची तिला आवड आहे. इतकेच नाही तर लावण्या आणि फिल्मी गाण्यांचे संस्कृतमध्ये रूपांतर करून गाण्याचा तिचा अनोखा छंद आहे.

कु. ओंकार मसूरकर, 9वी ब (इंग्रजी माध्यम)

ओंकारने राष्ट्रीय स्तरावरील 2010 ची एनटीस शिष्यवृत्ती पटकु. ओंकार मसूरकरकावली आहे. त्याच्या ह्या यशाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत :

टप्पा 1 - एसटीएस (राज्यस्तरीय). राज्यातून निवडलेल्या 500 विद्यार्थ्यांपैकी एक. गुण 164/200 थिअरी

टप्पा 2 - एनटीएस (राष्ट्रीय स्तर). अखिल भारतातून निवडलेल्या 4000 विद्यार्थ्यांपैकी एक. गुण 165/200 थिअरी

टप्पा 3 - एनटीएस (राष्ट्रीय स्तर). अखिल भारतातून निवडलेल्या 1000 विद्यार्थ्यांपैकी एक. गुण 19/25 मुलाखत.

भारतात 25 वा क्रमांक

नमस्कार...आचार्य... विरुद्ध गुड मॉर्निंग टीचर...


काही दिवसांपूर्वी शाळेतील आजी विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गात जाऊन भेटण्याचा योग आला ...तेव्हा वर्गात प्रवेश करताच सर्व विद्यार्थी वन... टु... गुड मॉर्निंग टीssssचर. असा घोष करीत कसेतरी उभे राहिले. हे दृश्य अतिशय विचित्र वाटलं ... मराठी माध्यमाच्या वर्गात शिक्षकांचे स्वागत इंग्रजीमधून व्हावे हा विरोधाभास वाटला...मृदुला कुलकर्णी
भाषेचा मुद्दा सोडला तरी आपली संस्कृती लक्षात घेता शिक्षकांनी वर्गात येताच विद्यार्थ्यांनी केवळ उठून उभे राहून हात जोडून नमस्कार करणे बरे दिसते. त्या साठी उगाच काही वेळ घालवून बालिश पणाने वन ... टु... असे म्हणत स्वागत करणे काही बरे वाटत नाही. एवढेही जमत नसल्यास केवळ उठून उभे राहणे पुरेसे आहे...
नमस्कार करण्यामागचा किंवा उठून उभे राहण्या मागचा उद्देश शिक्षकांना सन्मान देणे एवढाच असतो... त्याकरता विद्यार्थ्यांनी केवळ उठून नमस्कार करणे एवढी क्रिया पुरे आहे असे मला वाटते ...
आपली शाळा संस्कृतीचे जतन करणारी एक अग्रगण्य संस्था आहे ...  तेव्हा कृपया वरील मुद्द्याचा विचार केला जावा अशी विनंती ...
धन्यवाद ...
मृदुला कुलकर्णी ...

Monday, September 13, 2010

Scholarship Exam Results 2009-10

 

English Primary Section

Sr

No.

Name of the student

Marks

obtained

Out of 300

Rank

Out of

1977

1

Mst. Yash Sandeep Sawant

286

6th

2

Mst. Viraj Sunil Tawade

270

14th

3

Mst. Tanmay Vishwanath Nagwekar

268

15th

4

Mst. Atharva Bhalchandra Wadekar

264

17th

5

Ms. Swara Manoj Pathare

262

18th

6

Ms. Anushka Rajan Chachad

258

20th

7

Ms. Srushti Surendranath Haleangadi

256

21st

8

Mst. Yash Suhas Kudalkar

256

21st

9

Ms. Supriya Krushnakumar Samant

256

21st

10

Ms. Swarangi Sharad Choche

254

22nd

11

Ms. Saniya Paresh Kirkire

252

23rd

12

Mst. Rahul Nandkumar Mirashi

252

23rd

13

Ms. Aditee Satish Bawdhankar

250

24th

14

Ms. Chinmayee Shrikant Khare

248

25th

15

Ms. Shriya Hemant Wade

246

26th

16

Ms. Supra Pradeep Kudu

240

29th

17

Ms. Pooja Shailesh Deshpande

240

29th

18

Ms. Rasika Sameer Kalgutkar

238

30th

19

Ms. Navita Dilip Ukarde

236

31st

20

Ms. Ruchita Sanjay Nachne

236

31st

Marathi Primary Section

Sr.

No

Name of the student

Marks

Obtained

Out of

300

Rank

Out of

1977

1

Mst. Jayraj Vinayak Saraf

278

10th

2

Mst. Ninad Satish Thatte

264

17th

3

Ms. Swarangi Santosh Saraf

262

18th

4

Mst. Kaustubh Ramchandra Jadhav

258

20th

5

Ms. Jai Anant Jadhav

246

26th

6

Mst. Sudarshan Pandurang Sangle

244

27th

7

Mst. Sahil Praful Gosavi

244

27th

8

Ms. Samruddhi Yashwant Lavekar

244

27th

9

Mst. Siddhant satish Kudav

240

29th

10

Ms. Mrunamayee Ganesh Apte

238

30th

11

Ms. Advaita Deepak Sawant

236

31st

English Secondary Section

Sr.

no.

Name of the student

Total Marks

Obtained

out of 300

Rank

out of

1617

1

Mst. Soham Sachetan Gurjar

247

11

2

Mst. Rushikesh Prasad Joshi

238

34

3

Mst. Saurav Vishwas Surve

232

70

4

Mst. Pranav Umesh Karmarkar

229

86

5

Ms. Disha Anand Palkar

224

121

6

Mst. Sagar Paresh Shah

220

159

7

Mst. Akshay Yogesh Dalvi

215

218

8

Mst. Varun Rajesh Rege

206

346

9

Mst. Devashish Prasad Joshi

204

395

10

Mst. Ujjwal Raghunath Raut

199

494

11

Mst. Kunal Deepak Mestry

195

614

12

Mst. Vedant Ujjwal Vartak

192

702

13

Ms. Hemali Sandeep Sawant

188

848

14

Ms. Yashashree Laxman Samant

184

1045

15

Ms. Krupa Rajendra Gawde

183

1072

16

Mst. Omkar Sameer Samant

178

1311

17

Mst. Chirag Suresh Kothari

176

1487

Wednesday, September 8, 2010

Sunday, September 5, 2010

Examining Independence Day

Courtesy : http://sukumar-honkote.blogspot.com/

On our 64th independence day, we need to examine what this day means to us. I was told by a person yesterday that they never failed to go to school on this day as they were treated with chocolates and snacks. My memory goes back to the parades and the speeches extolling the past and invoking the future. Everyone has childhood remembrances associated with 15th august but none who understands even an iota of its significance in 1947.

   What does this day mean to us? A holiday to laze and relax, to go out with friends or family? A flame of patriotism does get evoked but to what consequence? It's a day to remind us to play Lata Mangeshkar's vande mataram and A.R. Rehman's Maa tujhe salaam. We wear Indian flag pin-ups, wave flags, add photos proclaiming independence to our profiles on facebook. What are we trying to achieve through this in your face proclamation? Dry day and the national holidays have become synonymous. Long speeches extolling the freedom struggle adorn the day but do we understand exploitation faced then when we talk of independence? Do the leaders who claim a great tomorrow realize the tomorrow that is not coming due to their actions? Can the omnipresent disdain shown by the people towards present conditions be channelled into a wave of social upliftment?

   Nehru enunciated 'the achievement we celebrate today is but a step, an opening of opportunity, to greater triumphs animaged achievements that await us.' The opportunity is ever present, triumphs are ever waiting. Instead of broadcasting our patriotism a small act of helping the nation and its citizens would go a long way in building a better India. In the wake of the present J and K crisis and the CWG scandal much responsibility of improvement is on our shoulders. Are we in need of a second independence to rout out the evil that plagues the nation? Are we really patriotic in our actions towards the nation and its people?

   Although cynicism beckons me to voice all this but I too question what I have done to strengthen the nation. I reiterate Nehru's question. 'Are we brave and wise enough to grasp the opportunity and accept the challenge of the future?'

Friday, August 20, 2010

Felicitation Ceremony Honouring Meritorious Students


Felicitation ceremony for meritorious students of SSC- March 2010 was held on 27th June, 2010 at 5.30 p.m. in the hall of new building. Ninety seven students were felicitated for their excellent performance and achievements in SSC Board Examination March-2010.

The function was graced by Hon. Mr. Yashwant M Devasthali, Director, Finance, L & T Ltd. The students, who secured 85% and above were honored with cash prizes and certificates. The sincere efforts of the students and the parents was recognized and felicitated by Vidya Prasarak Mandal.

The felicitation programme was commenced with prayer and welcome song, followed by welcome speech and introduction of chief guest by Mr. Vasuki Haranhalli, an active member of VPM’S governing council. The function was anchored by our teachers Mrs. Usha Shimoga and Mr. Sudhir Desai in English and Marathi respectively.

The chief guest congratulated the students for their excellent performance. He also congratulated the teachers and the parents not only for the achievements but for moulding the students the right way. “India will go on developing and the whole world will look at India. You will be able to fulfill your dreams in your own country. No need to go to America. Be innovative because you have that quality and capability.” advised, Mr.Y.M Devsthali. He asked the students to live the life with simplicity and humanity. He acknowledged the students ability and gifted them the motto to climb the ladder of success-“Never say NO to the work assigned to you, say I will do it.”

Mr. Gangurdey and Mr. Nare, the parents of first rank holders of both the sections expressed their gratitude towards school on behalf of all the parents. Hence, Mr. J S Salunkhe acknowledged the selfless efforts of the teachers on this day and asked the students to recognize and reciprocate even in future.

“To imagine a school without teachers is as impossible as to live without being born. Teachers are the real idols in the temple of knowledge.” Said, Ms.Gauri Nare, the first rankholder of English Medium. Mrs. Varsha Padvale and Mrs.Nilima Khadatkar congratulated their twinkling stars and future ambassadors on behalf of all the teachers. They motivated them for their future Endeavour’s. The programme was concluded with vote of thanks by Head Master Mr. D K Wagh.


Wednesday, July 28, 2010

बालोद्यान - एक आनंदयात्रा

- डॉ. सौ. वसुंधरा नाटेकर

डॉ. सौ. वसुंधरा नाटेकर
अरुणकमल प्राचीवर फुलले ...
पूर्वदिशेला (प्राची) सूर्य (अरुणकमल) उगवला  आणि त्याने साऱ्या सृष्टीत नवचैतन्य, आनंद फुलवला, हे तर अगदी नित्याचेच आहे.  आणि मग आपल्या दैनंदिन यात्रेला आनंदाने सुरुवात होते.  शिक्षणक्षेत्रातही अशीच एक आनंदयात्रा सुरू होते,  बालोद्यान - बालवाडीच्या रूपाने !
'बालोद्यान' - बाळगोपाळांनीं खेळण्याची, हसण्या-बागडण्याची बाग.  त्यांच्या शालेय आयुष्याची इवलीशी आनंदयात्रा सुरू होते ती याच बालोद्यानात.  त्यामुळे या उद्यानाचे अंतर्बाह्य स्वरूप कसे असेल किंवा असावे,  यचे कल्पनाचित्र आपल्या दृष्टीसमोर नक्कीच उभे राहिले असेल.
बालवाडीची संकल्पना मॅडम मॉंटेसरी यांनी मांडली ती अशी- 

'Education is not what teacher gives, it is aquired not by listening to words but by experience from the 'Enviornment '.  It is a method not of 'teaching' a child, but of 'living' by a child.'

    थोडक्यात, शिक्षक काय शिकवतात किंवा मुले शब्दरूपात काय ऐकतात, ते शिक्षण नव्हे, तर आजुबाजूच्या वातावरणातून जो अनुभव मुले घेतात तेच शिक्षण होय .  शिक्षण म्हणजे मुलांना शिकवण्याची पध्दत नसून मुलांकडून शिकण्याची, जाणून घेण्याची प्रक्रिया आहे;  आणि हे सर्वRole Play अगदी नैसर्गिक, हसत-खेळत अत्यंत मोकळ्या - ढाकळ्या , तणावमुक्त वातावरणात होणे हेही तितकेच महत्वाचे आणि अत्यावश्यक आहे; यात दुमत नसावे.

    आपले बाळ घराचा उंबरठा ओलांडून प्रथमच बालोद्यानची पायरी चढते तेव्हा त्याचे स्वागत तेथे कसे होईल? तो रडेल कां? तिथे तो काय करील ? काय शिकेल ? अभ्यास नीट करील नां? यासारख्या असंख्य प्रश्नांनी पालक अस्वस्थ होतात. सध्याच्या स्पर्धात्मक युगात आपले मूल कसे तरून जाईल ? याविषयी साशंक असतात. रोज वर्तमानपत्रातील शिक्षणक्षेत्रातील गोंधळाच्या बातम्यांनी त्यात आणखी भर पडत असते. पालकांच्या जिवाची ही घालमेल काही अंशी कमी व्हावी या उद्देशाने आपल्या बालोद्यानच्या नवीन स्वरूपाविषयी महत्वाची आणि आवश्यक माहिती सविस्तरपणे देत आहे.  बालवाडीचे शास्त्रशुध्द स्वरूप कसे असावे, त्याची उद्दिष्टे कोणती, ती उद्दिष्टे साध्य करण्याकरिता बालवाडीमध्ये लहानग्याना कशा प्रकारे हाताळावे, शिकवावे याविषयीचे माझे हे विवेचन केवळ माझे वैयक्तिक मत नसून मॅडम मॉंटेसरी या पाश्चात्य शिक्षणतज्ञ, तसेच आपल्याकडील श्रीमती ताराबाई मोडक, श्रीमती अनुताई वाघ,  श्रीमती शांताबाई आठवले यासारख्या बालशिक्षणासंबंधी बरेच संशोधन केलेया व्यक्तीचे आहे.

    सर्वप्रथम आपण लहान मुलांच्या शारिरिक, मानसिक भावनिक वाढीसंबंधी शास्त्रीय माहिती पाहू या.  आपल्या संपूर्ण आयुष्याच्या कालखंडाचा विचार केला तर अडीच ते सहा वर्षाचा काळ अत्यंत संवेदनाक्षम आणि संस्कारक्षम असतो.  मुलाच्या अंतरंग विकासाची गती ह्या काळात जेवढी असते तेवढी पुढे सत्तर वर्षापर्यंतही नसते.  तेव्हा हा काळ मुलाच्या व्यक्तिगत सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे ,हे ध्यानात येईल.  मुलाच्या मेंदूची जवळजवळ तीन चतुर्थांश वाढ याच काळात पूर्ण होते.  म्हणून बौध्दिक आणि मानसिक विकासाच्या दृष्टीने हे वय महत्त्वाचे आहे.  या काळात संवेदना ग्रहण करण्याची त्याची शक्ती अधिक तीव्र असते;  आणि शारीरिक जागृत असते.  'हे काय  ? ते काय ? कां ? कसे ?' या जिज्ञासू प्रश्नांचा भडिमार करतात आणि आपण त्याना उत्तरे देताना अगदी मेटाकुटीस येतो याचा अनुभव आपण घेतोच.

    मुलांची ही ओसंडून जाणारी ऊर्जा , प्रचंड जिज्ञासूवृत्ती, संवेदनाशीलता याना जर योग्य प्रकारे वाट दिली, वळण दिले तर त्यांची शारीरिक -मानसिक वाढ अगदी उत्तम होऊ शकेल. आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आपण सर्वजण म्हणजे मुलांचे पालक, शिक्षक-शिक्षिका -सर्वजण मिळून भक्कम करू.  एक गोष्ट आपण सर्वांनी ध्यानात ठेवली पाहिजे की या वयाची मुले टीपकागदासारखी असतात. त्यांच्यासमोर ठेवलेले सर्व बरे-वाईट ती सर्व चटकन आत्मसात करतात,  त्याचे अनुकरण करतात.  तेव्हा त्यांच्यासमोर कोणते संस्कार-आदर्श ठेवायचे.  याचे आत्मभान आपणा सर्वांनाच हवे.

    पहिली अडीच वर्षे मूल परावलंबी, आत्मकेंद्री असते.  सर्वप्रथम आई, मग बाबा, इतर माणसे यांच्या सहवासात वाढत असते.  हळूहळू  मोठे होताना त्याच्या विकासाला चार भिंतींचे घर अपुरे पडू लागते.  त्याला समवयस्क मित्र-मैत्रिणींची गरज वाटू लागते.  हळूहळू ते समाजात मिसळण्यासाठी तयार होत असते.  याचवेळी त्याला समाजात स्थान मिळवून देणारी ही संस्था आहे.  बालवाडी हा घर आणि समाज याना सांधणारा महत्त्वाचा दुवा आहे.  त्यामुळे  बालवाडीचे स्वरूप काहीसे घरासारखे व काहीसे शाळेसारखे असते.  घरासारखे म्हणजे प्रेमळ, घरगुती गोष्टी बोलणारे, आईसारखी कोणीतरी काळजी घेणारी माणसे असणारे; आणि शाळेसारखे म्हणजे स्वत:बरोबरच इतर मुलांचा विचार करणारे, नाना तर्हेचे खेळ , साधने-साहित्य यांचा भरपूर उपयोग करून देणारे, समूह शिक्षणातून सांघिक वृत्ती जोपासणारे, शिस्त शिकवणारे; स्वच्छतेच्या, वागणुकीच्या चांगल्या संवयी लावणारे, असे बालवाडीचे स्वरूप आहे.

    थोडक्यात, बालवाडी म्हणजे प्राथमिक शाळेचा पूर्वअभ्यासक्रम नसून प्राथमिक शाळेतील अभ्यास आत्मसात करण्याची मुलांची मानसिक बैठक तयार करणारी संस्था आहे.  प्राथमिक शाळेत पुढे करायच्या अनेक गोष्टींची सुरुवात बालवाडीत होते.  उदाहरणार्थ, मुलाला संयम शिकावा लागतो,  हालचालींवर ताबा मिळवावा लागतो, मनाची एकाग्रता वाढवावी लागते.  या सर्व गोष्टी मुलाच्या नकळत सहजपणे बालवाडीत साधल्या जातात.  त्यामुळे पुढे शाळेत सलग चार-पाच तास बसणे, लेखन-वाचन करणे, हे सुसह्य होते. मूल अभ्यास करायला कंटाळत नाही, गोंधळत नाही.

    तात्पर्य, बालोद्यानचा अभ्यासक्रम म्हणजे फक्त 1 ते 10 अंक, क, ख,ग, घ; A, B, C, D, 1-10 अंक हे स्वरूप नसून त्याच्या आरोग्याचा विकास म्हणजे स्वच्छता, आहार, व्यायाम, विश्रांती; त्याची मानसिक गरज म्हणजे प्रेम, संरक्षण, विश्वास, मनोरंजन; त्याचा भावनिक विकास म्हणजे आनंद, सहसंवेदना, शांती- समाधान, प्रेमभावना, आदर; हे सर्व बालोद्यानच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत आहे.

    एकूण बालोद्यानचे स्वरूप, कार्य, उद्दिष्ट यांचा सविस्तर ऊहापोह केल्यानंतर पुढचा प्रश्र्न-'आपल्या म्हणजे विद्या प्रसारक मंडळाच्या बालोद्यानमध्ये हे सर्व होते कां?'  या प्रश्र्नाचे उत्तर "हो' असे आहे.  आता चर्चा  केलेल्या 
बऱ्याच गोष्टींचा विचार करूनच आपल्या बालोद्यानची आखणी केलेली आहे. मुलांना साधनांद्वारे, खेळण्यांच्या माध्यमातून सर्व प्रकारचे आवश्यक ते शिक्षण आपण देतोच, पण आतापर्यंत शाळेची जागा मर्यादित होती, आणि बालोद्यानसाठी मिळणारा वेळही थोडा कमी होता.  त्यामुळे अनेक गोष्टी करायच्या मनात असूनही करता येत नव्हता.  परंतु  आता आपण आपल्या शाळेच्या नवीन, भव्य, प्रशस्त, हवेशीर वास्तूत प्रवेश केला आहे.  या नवीन इमारतीत बालोद्यानसाठी उपलब्ध जागा खूपच मोठी आणि ऐसपैस आहे.  मोठेमोठे वर्ग, कार्यशाळा, मैदानव्या इमारतीमधील सभागृहात नी खेळ, बैठे खेळ या सर्वांसाठी भरपूर मोकळी जागा, जेणेकरून आपली मुले स्वैरपणे बागडत, हसतखेळत त्यांच्या नकळ्त शिकू लागतील.
बालवाडीची जास्तीत जास्त उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या नवीन वास्तूत नूतन बालोद्यानची रचना अशी आहे-
-30' X 20' = 500 चौ.फूट आकाराचे 3 वर्ग (खोल्या)
-मैदानी खेळ व बैठे खेळ खेळण्यासाठी अतिशय सुरक्षित व खूप प्रशस्त जागा.
-सी-सॉ, घसरगुंडी, झोपाळे, होड्या यांची मोकळ्या जागेत मांडणी
-मुलामुलींसाठी त्यांच्या उंचीस योग्य अशी, स्वतंत्र , स्वच्छतागृहे.
-मुलांचे बूट वर्गातच ठेवण्यासाठी शूरॅक्स तसेच त्यांचे खाऊचे डबे,वॉटरबॅग, बॅग ठेवण्यासाठी रॅक्स -यांची रचना व उंची अशी की प्रत्येक मूल आपले सामान स्वत: घेऊन वापरू शकेल व स्वावलंबनाचा पाठ त्याला त्यामधूनच मिळेल.
-मुलांना वर्गात बसण्यासाठी आकर्षक रंगाची कारपेटस्‌ व त्यावर सुंदर सतरंज्या.  त्याच्यासमोर रंगीबेरंगी छोटी,लांब लाकडी बाकडी त्यांचा उपयोग मुलानी खाऊ खाणे, चित्रकला, हस्तकला, खेळ्-मांडणी यासाठी होईल.

* मुलांना  बसवण्यासाठी मोठी बेंचेस नाहीत.

कारण -     1) या वयातील मुलांनी एकाच जागी बसून राहाणे अपेक्षित नाही.  त्यांच्या शरीराची सतत हालचाल हवी, जी त्यांच्या स्नायूंच्या वाढीला पोषक आहे. एकाच जागी बसणारे मूल आळशी, मलूल दुबळे होते.  त्याच्यातील नैसर्गिक उर्जेला वाव देण्यासाठी त्याने सतत खेळते राहावे.

    2) त्याची सोशल डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टीनेही ते एकाच जागी बसणे योग्य नाही.  त्यामुळे ठराविक मुलांशीच त्याचा संवाद होईल.  शेजार, सहकार्य, दुसऱ्याला समजून घेणे या गोष्टींसाठी मुलांनी छोट्या छोट्या ग्रूपमध्ये राहाणे अपेक्षित आहे.

    3) जमिनीवर बसल्याने मुलांच्या शिक्षिका देखील त्यांच्याजवळ तशाच बसून गप्पा-गोष्टी करतील.  त्यांचा सहवास मुलांना सुरक्षितता आणि आईची मायाही देतो, त्यामुळे मुलांची बाईंशी भावनिक जवळीक निर्माण होऊन ती तणावमुक्त वातावरणात हसत-खेळत शिकतील.

    4) शारिरिक वाढीच्या दृष्टीनेही बेंचवर बसल्याने मुलांच्या हालचालीवर बंधन येते.  विशिष्ट कोनातच गुडघे-पाय-राहिल्याने त्यांचे स्नायू, स्नायूबंधने, सांधे यांची वाढ योग्य प्रमाणात न होता ते जखडल्यासारखे होतात.  मांडी घालून बसण्याची नैसर्गिक क्रिया सुध्दा शिकवावी लागते.  आज आपल्या संस्कारातील सूर्यनमस्कार, योगक्रिया यांचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे, उद्या मांडी घालून बसण्याचे फायदे आपल्याला त्यांच्याकडून ऐकावे न लागोत !

* मुलाना पेन-पेन्सिल-वही लिखाणासाठी नाही:


या वयातील मुलांनी बाराखडी, अंकलेखन  इ. करणे अपेक्षित तर नाहीच किंबहुना शास्त्रीय दृष्टया ते पूर्ण चुकीचे आहे.  कारण या वयात त्यांच्या हाताची बोटे व मनगटे यांचे स्नायू  व सांधे यांची वाढ झालेली नसते.  अशावेळी लिखाणासारखे काम करताना त्यावर पडणारा अनावश्यक  व अति दाब त्यांच्या नैसार्गिक वाढीला अडथळा करतो.  शिवाय डोळे हे ज्ञानेंद्रिय व हात, बोटे हे कर्मेन्द्रिये यांच्या कामाचा मेळ (co-ordination)  ही व्यवस्थित होत नसतो. परिणामी लेखन-हस्ताक्षर बिघडते; सदोष होते.

    तात्पर्य, या वयातील मुलांना लिखाणाची जबरदस्ती करू नये; इतर शाळांमध्ये बरेच लेखन मुलांना शिकवले जाते म्हणून लिखाणाचा अट्टाहास करू नये.  त्यामुळे आमच्या शिक्षण देण्याच्या मूळ संकल्पनेलाच तडा जाईल.  आपल्या बालोद्यानमध्ये मुलांना भाषाकौशल्य, गणित, इंद्रिय-विज्ञान, संगीत, नृत्य इ.विषय आपण त्यांच्या नियोजित अभ्यासक्रमाप्रमाणे शिकवणारच आहोत, पण ते सर्व साधनांद्वारे, खेळाद्वारे. म्हणजे मनोरंजनातून त्यांचे शिक्षण होईल, जेणेकरून त्या त्या विषयातील मूळ संकल्पना (Basic concepts)  सुरूवातीपासूनच पक्के होतील. तेव्हा दोन वर्ष तरी मुलांच्या अभ्यासाविषयी, गृहपाठाविषयी निश्चिंत राहा आणि हा वाचलेला वेळ आपल्या मुलाबरोबर खेळण्यात, गप्पा मारण्याबालोद्यानातील रंगपंचमी त सत्कारणी लावा.  विश्वास ठेवा, असे केल्याने तुमचे मूल अभ्यासात मागे न राहाता पुढील प्राथमिक अभ्यासाची त्याची पूर्वतयारी इतकी सुंदर होईल की उत्तरोत्तर त्याच्या प्रगतीचा आलेख उंचावलेलाच दिसेल.  आपल्या विद्यामंदिर शाळेचे दरवर्षीचे दहावीचे  निकाल आणि अभ्यासेतर क्षेत्र जसे क्रीडा, गायन-नृत्य, विज्ञान इ.मधील मुलांचे नैपुण्य पाहिले तर आपली खात्री पटेल की, ही संस्था, शाळेचे  शिक्षक मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.  मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांची जडणघडण अशी केली जाते की भविष्यात तो एक सक्षम नागरिक बनेल, आणि त्याची पायाभरणी आपल्या बालोद्यानमध्येच केली जाते. कारण मुलाचे बालपण कसे गेले आहे, त्यावर त्याचे तरुणपणीचे व्यक्तिमत्त्व अवलंबून असते.

    ह्या सविस्तर लेखनाचा समारोप करताना सांगावेसे वाटते की, पालक म्हणून आपण आपल्या मुलांना दोन गोष्टी देऊ शकतो. ताठ उभे राहाण्यासाठी मूळ आणि आकाशात झेप घेण्यासाठी पंख !

Monday, July 19, 2010

कौतुक सोहळा २०१०

शालान्त परीक्षेचा निर्णय लागल्यावर दरवर्षीप्रमाणेच विद्या मंदिरच्या प्रांगणात उत्साहाचे वातावरण होते.

मराठी विभागाचा निर्णय ९१.४९% तर इंग्लिश विभागाचा निर्णय १००% लागला.

 

image image

         image      परुष्णी विलास मांजरेकर ९४%

        image      सूरज उदय पै ९३.३८%

यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा साजरा करताना बेस्ट ऑफ फाइव्हप्रमाणे गुण विचारात घ्यायचे की नाही हे नक्की होत नव्हते. अखेरीस मुलांच्या कौतुकासाठी उशीर तरी किती करायचा ह्या विचाराने पारंपारिक पद्धतीनुसार मिळालेले गुण विचारात घेण्यात आले.

clip_image002clip_image004 

imageimageimage

  ह्या सर्व गुणी विद्यार्थ्यांचं कौतुक २७ जून रोजी विद्या मंदिर शाळेच्या नव्या सभागृहात एका सुंदर सोहळ्यात करण्यात आलं. शाळेचेIMG_6464 (Large) हितचिंतक आणि आश्रयदाते एल अँड टी चे वित्तीय संचालक श्री. यशवंत देवस्थळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी  होते. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध विमा गणिती, 

श्री. ज. स. साळुंखे, उपाध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर, शाळा समितीचे अध्यक्ष श्री. दिलीप म्हांबरे, मुख्याध्यापक श्री. दि. का. वाघ सर आणि सौ. जागृती सावे मॅडम ह्यांच्या  सन्माननीय उपस्थितीत हा IMG_6588 (Large)सोहळा साजरा झाला. मंडळाचे सदस्य, हितचिंतक, पालक आणि विद्यार्थी समारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ह्या प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची तसेच शिक्ष कांची भाषणे झाली.  श्री. सुधीर देसाई सर आणि श्रीमती उषा शिमोगा मॅडम ह्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

दरवर्षीप्रमाणेच मुलांच्या यशाचा आढावा घेणारी एक पुस्तिका वितरित करण्यात आली होती.  IMG_6449 (Large)

शाळेच्या नव्या इमारतीमध्ये हा सोहळा साजरा होत असल्याचा विशेष आनंद सर्वांनाच विशेषत: विद्यार्थ्यांना होता.